छत्रपती संभाजीनगर – भलेही आमची आता त्यांच्याबरोबर युती नसेल. पण अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी एमआयएम पूर्ण मदत करेल, असे एमआयएमचे प्रमुख असोद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी औरंगाबाद येथे सांगितले. अकोला लोकसभा मतदार संघातह वंचितला पाठिंबा देताना पुणे येथेही उमेदवार उभा केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

हेही वाचा >>> धाराशिव : ओमप्रकाश राजेनिंबाळकर १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

Dhananjay Munde On Anjali Damania:
Dhananjay Munde : “धादांत खोटे आरोप, पण ज्याने कोणी आरोप करण्याचं काम दिलं असेल…”, अंजली दमानियांच्या आरोपाला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Anajli Damania on dhananjay Munde
“…आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याच”, भर पत्रकार परिषदेत पुरावे सादर केल्यानंतर अंजली दमानियांची मागणी!
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Sandeep Kshirsagar FB
“धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य”, अजित पवारांच्या त्या प्रतिक्रियेनंतर संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
Supriya sule
Supriya Sule : “अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २४ तासांचा वेळ देऊ”, सुप्रिया सुळेंनी कशासाठी दिला अल्टिमेटम?
elizabeth ekadashi fame sayali bhandakavathekar talk about why didn't choose acting field
‘एलिझाबेथ एकादशी’ फेम झेंडूने पुढे अभिनय क्षेत्र का निवडलं नाही? सायली भांडाकवठेकर म्हणाली, “हे भयानक…”

ते म्हणाले, जरी आता आमची वंचित बरोबर युती नसेल तरी दलित आणि वंचित समाजाचे नेतृत्व असावे, हे आमचे मत आहे आणि म्हणून अकोल्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी प्रकाश आंबेडकरांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. गेल्या काही महिन्यात एका किरकोळ शरीरयष्टीच्या माणसाने महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांना हादरवून टाकले.

मनेज जरांगे यांनी त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी जे काही केले आहे, ते एखादा ‘दिवानाच’ करू शकतो. असा ध्येयवेडेपणा नक्की असायला हवा. म्हणूनच त्यांना माझं आवाहन आहे की, त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन करावा. कारण लोकशाहीत मतदान मिळविणे आणि त्याचे नेतृत्व उभं करणे यातूनच विकास घडत असतो. त्यामुळे जरांगे यांनी त्यांच्या पक्ष स्थापन करावा, असे आवाहनही ओवैसी यांनी केले. एमआयएमच्या विजयी उमेदवाराला हरवण्यासाठी साडे पाच पक्ष मैदानात उतरले आहेत. दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना आणि अर्धी काँग्रेस या साडे पाच पक्षांसमोरही औरंगाबादचा खासदार टिकून राहील, असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी समान नागरी कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदी या कायद्यान्वरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र, टीकेचा रोख उद्धव ठाकरे गटाकडे अधिक होता. गेल्या तीस वर्षांत काहीही काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधीने माझी ही शेवटची निवडणूक आहे, असे म्हटले आहे. खरं तर त्यांची निवडणूक २०१९ मध्येच शेवटची होती.

Story img Loader