छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याकडून विविध समाजमाध्यमावरील संदेशांवर २४ तास लक्ष ठेवण्यात येत असून, आजपर्यंत ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ५०६ संदेश नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली.

सध्या राज्यात असलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरील शक्यता लक्षात घेऊन संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात समाजमाध्यमावरून पाठवल्या जाणाऱ्या संदेशांवर लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये सायबर पोलिसांनी २० मार्च २०२५ रोजी २ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय पोलीस समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह संदेश शोधण्याचे कामही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाचा मुद्दा पेटलेला असून, नागपूरमध्ये दंगलही उसळळी होती. य पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवले जात आहे. दोन दिवसांपूर्वी दोन दिवस पाेलिसांचा रूटमार्च निघाला होता. सिटी चौक पाेलीस ठाण्याच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

Story img Loader