आज मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्षे पूर्ण झाली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी दिवस साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने ४५ हजार कोटींपेक्षा अधिकची विकासकामं मंजूर केल्याचंही त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, “काल (१६ सप्टेंबर) संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली. आपल्या मराठवाड्यासाठी सरकार काय निर्णय घेणार? हे पाहण्यासाठी सर्वजण या बैठकीकडे डोळे लावून बसले होते. यातून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचं पर्व सुरू झालं आहे, असं मी नम्रपणे सांगू इच्छितो. कारण या बैठकीत आम्ही ४५ हजार कोटींपेक्षा जास्तीची विकासकामं मंजूर केली आहेत. मराठवाड्याची दुष्काळापासून कायमस्वरुपी सुटका करायची आहे. पावसाचं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना प्रस्तावित आहे. मागच्या काळात ही योजना मंदावली. पण आता आपण यासाठी १५ हजार कोटींची तरतूद केली आहे.”

readers feedback on loksatta editorial
लोकमानस :  प्रक्रिया धुडकावून अधिसूचना
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
st employees congress
एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्यासाठी शासनाने तत्काळ निधी द्यावा, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी
Supreme Court guidelines to central government state governments and authorities to eradicate child marriage from society
बालविवाहाच्या उच्चाटनासाठी मार्गदर्शक सूचना; जोडीदार निवडण्याच्या अधिकारावर गदा येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
CCTV cameras Thane to Badlapur, CCTV cameras Thane,
ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
Ravindra Dhangekar Allegation, Radhakrishna Vikhe Patil,
महसूलमंत्र्यांच्या वरदहस्ताने पुनर्वसनाच्या जमिनीमध्ये २०० कोटींचा घोटाळा – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत

हेही वाचा- “प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घ्या”; राणेंच्या विधानानंतर आव्हाडांचं खुलं आव्हान, म्हणाले, “हिंमत असेल तर…”

“मराठवाड्यात रस्तेही चांगले झाले पाहिजेत, यासाठी आपण शेकडो कोटी निधी दिला आहे. मराठवाडा हा कोकणासारखा पावसाचा प्रदेश नाही. इथे पश्चिम महाराष्ट्रासारखी सधनता नाही. पण मराठवाड्यातील लोकांनी कष्टाने या प्रदेशाला फुलवलं आहे. त्यांनी आपल्या घामाने सिंचन केलं आहे. पावसाने जरी ओढ दिली असली तरी शेतकऱ्याला जिथे नुकसान होईल, तिथे सरकारकडून मदत केली जाईल”, असं आश्वासनही एकनाथ शिंदेंनी दिलं.

“सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिल. गेल्या वर्षभरात आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले. सगळ्या अटी-शर्ती धाब्यावर बसवल्या. एनडीआरएफचे नियम बाजुला ठेवले आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत केली. एक रुपयात पीक विम्याची योजना आणली”, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.