छत्रपती संभाजीनगर –  स्मशानभूमीकडे जाण्यासाठीचा मार्ग पावसामुळे चिखलमय झालेला असताना आणि रस्ता मंजूर असतानाही तयार करण्यात येत नाही, याच्या निषेधार्थ एका ज्येष्ठ मृत व्यक्तीचा अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच करण्यात आला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे बुधवारी दुपारी घडली. या घटनेला दुजोरा देताना अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी सांगितले की, यासंदर्भाने अद्याप तक्रार दाखल नसल्याने कुठलीही नोंद पोलीस दप्तरी करण्यात आलेली नाही.

हेही वाचा >>> अंगणवाडी मदतनिसकडे पदोन्नतीसाठी ५० हजारांची मागणी; वैजापूरच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यासह शिपाई सापळ्यात

Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
caste panchayat investigates woman for love marriage with father in law in chhatrapati sambhajinagar
सासऱ्याच्या प्रेमविवाहाबद्दल महिलेला जातपंचायतीचा जाच
pune two minor girls gangraped marathi news
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार
Who killed Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम
cops molested young lady attempted kidnapping two vasai policemen suspended
पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित
Chaitanya maharaj wadekar
प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक, नेमकं काय कारण? वाचा सविस्तर…

गोळेगाव ग्रामपंचायत ही सिल्लोड विधानसभा मतदार संघात येत असून येथील आमदार अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व अल्पसंख्याकमंत्री आहेत. सत्तार यांच्या मतदार संघातील अनेक गावांमधील स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ते नसल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. गोळेगाव येथील लक्ष्मण रायभान गव्हाणे (वय ७५) यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. दुपारी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. परिसरात यापूर्वी झालेल्या पावसाने रस्ते चिखलमय झालेले आहेत. स्मशानभूमीच्या मार्गावरही चिखल झालेला असून अंत्यविधीला कसे जायचे, असा प्रश्न ग्रामस्थांंपुढे होता. काही ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्मशानभूमीसाठीचा रस्ता सातबारावर नोंद असून, दोनवेळा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतरही रस्ता तयार करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ मृतांचे नातेवाईक व काही ग्रामस्थांनी मिळून मृतदेहच ग्रामपंचायतीसमोर आणून अंत्यविधी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.