एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या अभूतपूर्व बंडखोरीनंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून राज्यभर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीही नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तशी माहिती शिंदे गटातील स्थानिक नेते तथा औरंगाबाद महापालिकेचे माजी महापौर राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थकही स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत.

हेही वाचा >> बंडखोर खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश

Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mla Vijay Shivtare of Shiv Sena Shinde faction has been removed from District Planning Committee
आमदार शिवतरेंना वगळले, महायुतीत वादाची ठिणगी ?
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Afghan National Arrested For Illegally Staying In India For 17 Years
भारतात १७ वर्षांपासून बेकायदा राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला मायदेशी पाठविण्याचे आदेश

औरंगाबाद महापालिकेची निविडणूक लवकरच होण्यची शक्यता आहे. असे असताना शिंदे गट आणि भाजपा हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. “औरंगाबाद महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिंदे गट आम्ही एकत्र लढवणार आहोत. हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्द्यांना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जागावाटपाचा निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार घेण्यात येईल. तशी आमची तयारी झालेली आहे,” असे जंजाळ यांनी टीव्ही ९ मराठीला सांगितले.

हेही वाचा >> शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर केली घोषणा

“शहराचा विकास झाला पाहिजे, अशी लोकांची इच्छा आहे. पण शहराच्या विकासासाठी जो निधी हवा आहे, तो पालिकेकडे नाही. राज्य सरकारकडूनच हा निधी घेता येईल. राज्य सरकार आमचे आहे. राज्य सरकार भाजपा आणि शिवसेना यांच्याकडून एकत्रीतपणे चालवले जात आहे. महापालिका आमच्या ताब्यात असेल,” असा विश्वासही जंजाळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >> “धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे समर्थक ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. “शिवसेना पक्ष तयारी सुरु केली आहे. शिंदे गट आणि भाजपा एकत्र येत असतील शिवसेनेसाठी चांगली गोष्ट आहे. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसशी आमची युती होणार की नाही हा पुढचा प्रश्न आहे. सध्यातरी शिवसेनेने सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे,” अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.

Story img Loader