छत्रपती संभाजीनगर : आता भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राहिलेली नाही. ती एक ‘ डुप्लीकेट’ पार्टी आहे. त्यांच्याकडे कलंकित नेते गेले की ते शुद्ध होतात आणि तेच नेते जर आमच्याकडे आले की कलंकित कसे ? असा सवाल करत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी संघ दक्ष करुन दाखवावे, असे आव्हान दिले.

हेही वाचा : धर्मांतराच्या संशयावरून सुदान मधील तरुणाला अटक

congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली

‘कोणी मिर्चीचा व्यापार करतात तर कोणी मिर्चीबरोबर व्यापार करतात’, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्ची या गुंडाशी असणारे संबंध सर्वांना माहीत आहेत. ते आता कलंकित नाहीत का, प्रताप सरनाईक यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाची कारवाई झाली नव्हती का, भावना गवळी, सुनील तटकरे हे आता कलंकित का नाहीत, छगन भुजबळ यांना तर कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाजपची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली आहे. अशा व्यक्तींना घेतल्याशिवाय त्यांना निवडणूक लढता येणार आहे का, खरे तर आताची भाजप आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची राहिलेली नाही. आणि खरेच ते संघाचे असतील तर विखेंनी संघ दक्ष करुन दाखवावे, असे आव्हान अंबादास दानवे यांनी विखेंना शनिवारी पत्रकार बैठकीत दिले. अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा आढावा देण्यासाठी दानवे यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

Story img Loader