छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातून पाणी कमी करण्यासाठी सूत्र बदलण्याची महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या महासंचालकांनी केलेली शिफारस फेटाळावी तसेच मराठवाड्यातील पाण्याच्या समस्यांबाबतचे सारे प्रश्न आता जलसमृद्धी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यपालांच्या कानावर घालण्यात आले. पाणी टंचाईच्या काळात जायकवाडी धरण जेव्हा ६५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी भरलेले असेल तेव्हा गोदावरीच्या उर्ध्व धरणातून पाणी सोडण्याची अट आता ५८ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आली आहे. या अहवालास आक्षेप व हरकती घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. एका बाजूला आक्षेप व हरकती दाखल होत असतानाच हा प्रश्न राज्यपालांच्या कानावर घालण्यासाठी जल अभ्यासक शंकरराव नागरे, उद्योजक रमांकात पुलकुंडवार आणि जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अभियंता जयसिंग हिरे यांनी समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा राज्यपालांच्या कानावर घातला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा