शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील एक लाख ७८ हजार तरुण हताश

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Viral Video Of Desi Jugaad
कामगाराला बाहेर काढण्यासाठी लावलं भन्नाट डोकं; Video तील जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चुकूनही देशाबाहेर… ‘
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
best started fillingats inviting applications for Joint Assistant in electrical department
अखेर बेस्टला मुहूर्त सापडला, विद्युतपुरवठा विभागात भरती सुरू
businessman attacked with sharp weapon over minor dispute near kasba ganapati temple
किरकोळ वादातून व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; कसबा गणपती मंदिराजवळील घटना
Mahatma Gandhi death anniversary, smart prepaid meter, Protest , Nagpur,
नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात आंदोलन गांधी पुण्यतिथीच्या दिवशी

आता महिनाभरात आचारसंहिता लागेल आणि नोकर भरती अडकून पडेल.  या भीतीने विवेक धांडे या तरुणाला ग्रासले आहे. २०१२ मध्ये त्याने डी.एड. शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या मागेपुढे शिक्षणशास्त्राची ही पदविका घेतलेल्या तब्बल एक लाख ७८ हजार जणांनी शिक्षण पात्रता परीक्षेनंतर अभियोग्यता परीक्षेतही यश मिळविले. या परीक्षेचा निकाल लागून आता १३ महिने झाले आहेत. आचारसंहिता तोंडावर आली आहे आणि अजून रिक्त जागांच्या निश्चितीची बिंदुनामावली तयार झालेली नाही. गेल्या महिन्यात या कामाला सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आणि डी.एड पूर्ण होऊन नोकरी नसल्याने तरुणांची धाकधूक वाढू लागली आहे. दर पंधरा दिवसाला रिक्तपदांचा नवा आकडा शिक्षणमंत्री सांगतात. त्यामुळे भरती प्रक्रिया खरेच आचारसंहितेपूवी होईल काय, या चिंतेने डी.एडधारकांना ग्रासले आहे.

नोकर भरती व्हावी म्हणून माहितीच्या अधिकारात रिक्त पदांची माहितीही मिळविण्यात आली. २०१० पासून शिक्षक भरती झालेली नाही.  त्यामुळे राज्यात मुख्याध्यापकांची २२१३ पदे, पदवीधर शिक्षकांची १०२२८ पदे व सहशिक्षकांची ७९७९ पदे रिक्त आहेत. मान्य पदे आणि कार्यरत पदाची वजाबाकी करुन विवेक रिक्तपदांचा अभ्यास सांगत होता. तीन वेळा शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची समाजमाध्यमातून उडवली जाणारी खिल्लीही त्याने दाखविली. वारंवार आश्वासन देऊनही भरती होईल काय आणि झाली तर ती आचारसंहितेपूर्वी होईल काय, या विषयी या क्षेत्रातील उमदेवार शंका व्यक्त करू लागले आहेत. विवेक धांडे, किरणकुमार सोनाळे, संतोष मगर अशी किती तरी सुशिक्षित बेरोजगार मंडळी भरती वेळेवर व्हावी, यासाठी निवेदने देत आहेत. रिक्तपदांचा एकूण आकडा जरी सरकारकडून दिला जात असला तरी जिल्हानिहाय कोणत्या प्रवर्गातील पद भरायचे आहे, याची माहिती अद्याप तयार नाही. स्थानिक स्वराज संस्था, खासगी अनुदानित व विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांकडून बिंदुनामावलीनुसार पदसंख्या कळविण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेल्या मर्यादेला दोनवेळा मुदतवाढही देण्यात आली. मात्र, काम पुढे सरकत नसल्याने भरती प्रक्रिया लटकेल, या भीतीने अनेक तरुणांना ग्रासले आहे. आचारसंहितेपूर्वी भरती न झाल्यास आम्ही काय करावे, असा प्रश्नच असल्याचे किरणकुमार सोनाळे सांगत होते. जालना आणि हिंगोली जिल्हय़ातील हे तरुण सध्या औरंगाबादमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करत आहेत. गावी दुष्काळ पडल्याने आई-वडिलांकडून मिळणारी दरमहा खर्चाची रक्कम कमी झाली आहे. आचारसंहितेपूर्वी भरती व्हावी म्हणून काहीजणांनी पाठपुरावाही सुरू केला आहे.

Story img Loader