शिवसेनेला सत्तेतही सहभाग हवा आहे आणि विरोधकांमधील जागाही हवी आहे. सत्तेत सहभागी असताना दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कशाला, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आता पंतप्रधानांनी आमचे नाही तरी त्यांचे तरी ऐकावे, असे म्हणत कर्जमाफी ही गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.