कौरवांनी पांडवांना द्युतात हरवून बारा वर्षे वनवास व एक वर्षे अज्ञातवासात पाठवलं होतं. पांडव वनवासात असताना त्यांच्या दारिद्रय़ाला हिणवावं व स्वत:च्या श्रीमंतीचं प्रदर्शन करावं म्हणून कौरव आपल्या कुटुंबकबिल्यासह पांडव राहत असलेल्या द्वैतवनात जात असत.
एकदा दुर्योधन आपल्या परिवारासह द्वैतवनातील सरोवराकडे जाण्यास निघाला, त्याच वेळी चित्रसेन गंधर्व आपल्या अप्सरांसह त्याच सरोवरात जलक्रीडा करत होता. सरोवराकडे येणाऱ्या दुर्योधनाला पाहून गंधर्वानं त्याला तेथे येण्यास अटकाव केला. या अडवणुकीचा दु:शासनाला प्रचंड राग आला. क्रोधमग्नतेतूनच त्यानं गंधर्वाना युद्धाचं आव्हान दिलं. दोन्ही पक्षांत तुंबळ युद्ध सुरू झालं आणि त्यात गंधर्वाची सरशी झाली. गंधर्वानी कौरववीरांचा पराभव केला. गंधर्वापुढे कौरवांची दयनीय अवस्था झाली. यातून आपण वाचणे कठीण आहे, हे लक्षात आल्यावर चार-सहा कौरवसैनिक जीव मुठीत धरून कसेबसे पळ काढीत वनवासात असलेल्या युधिष्ठिरासमोर पोहोचले आणि अक्षरश: त्याच्या हातापाया पडत कुरुकुलाची अब्रू वाचविण्याची विनंती करू लागले.
यावर भीम म्हणाला, ‘‘आपण आता काहीही करायचं नाही. सगळ्या कौरवांचा यक्षाच्या हातून नाश होऊ दे. आपोआपच कौरवांचा काटा काढला जाईल. सुंठीवाचून खोकला जाईल.’’ पण भीमाचं हे म्हणणं युधिष्ठिराला अजिबात रुचलं नाही. तो म्हणाला, ‘‘आपापसात भांडताना आपण पाच विरुद्ध ते शंभर कौरव हे ठीक आहे, पण जेव्हा परकीयांशी मुकाबला करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही एकशे पाच मिळून शत्रूशी मुकाबला करू. शत्रूला चारीमुंडय़ा चीत करू.’’
अशा प्रकारे हर तऱ्हेनं समजूत घालून युधिष्ठिरानं भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वाना कौरवांच्या मदतीसाठी तयार केलं. पांडव गंधर्वाविरुद्ध लढण्यासाठी कौरवांना जाऊन मिळाले व कौरवांसह पांडवांनी लढून गंधर्वाना धूळ चारली व शत्रूशी लढताना ‘वयम् पंचाधिकम् शतम्! हे दाखवून दिलं.
अशा प्रकारे आपापसात कितीही हेवेदावे असले तरी परकीयांशी लढताना एकजुटीनं लढा देण्याच्या वृत्तीला ‘वयम् पंचाधिकम् शतम्’ म्हटलं जातं.

Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
Maharashtra Two Tiger Death, Tiger Death, pench ,
राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू
Abhijeet Adsul , Shivsena , Amravati, Ravi Rana ,
“महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…
Story img Loader