मुंबईकर किड्या मुंग्यांसारखे जगतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मुंबईमधील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ब्रिजपैकी एक ब्रिज म्हणजे सीएसएमटी स्टेशनवरचा दादार एण्डचा ब्रिज. या ब्रिजचा स्टेशनबाहेरचा भाग आज पडला आणि काही सामान्य मुंबईकरांना प्राण गमावावे लागले. मृतांचा आकडा किती, जखमी किती या बातम्या येण्याआधीच ब्रिज बीएमसी अख्त्यारित होता की रेल्वेच्या यावरुन पालिका अधिकारी, नगरसेवक यांच्याकडून स्पष्टीकरण येऊ लागले. मुळात हा जणू पॅटर्नच झाला आहे. दुर्घटना होणार… आरोप-प्रत्यारोप होणार… काहीजण जीवानीशी जाणार… काही जखमी होणार… महापालिका आणि राज्य सरकार मदत जाहीर करणार… मग त्या तुटलेल्या वास्तूची डागडुजी होणार… मग मुंबईकर सगळं विसरणार आणि ‘मुंबई स्पिरीट’ या गोंडस नावाखाली पुन्हा दैनंदिन काम सुरु करणार… वर्षभराने अरे हा याच दिवशी अमूक अमूक झालं होतं अशी आठवण काढून मेणबत्त्या लावणार आणि कामाला जाणार… मग त्या दुर्घटनेतून सावरत नाही तोच वर्ष दीड वर्षात आणखीन एक दुर्घटना घडणार… आणि मग परत तेच ते अन् तेच ते…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा