रामकथेची लोकमानसावर मोहिनी आहे. सहस्रकांचा कालावधी लोटला तरी राम कथांचे आकर्षण तसेच अबाधित आहे. ९० च्या दशकात दूरदर्शनवरील रामायणातील हलत्या चित्रांनी समुच्च भारतीय समाजाला वेड लावले होते. परिस्थिती अशी होती की प्रेक्षक भक्तिभावाने, शुचिर्भूत होऊन दूरदर्शनच्या पडद्यासमोर बसत होते. रामकथा चालू असताना चित्रपटगृहे ओस पडू लागली. यातूनच भारतीय जनमानसावर असणारी रामायणाची भुरळ दिसून येते. आजही काहीसे असेच चित्र आहे. आणि हेच चित्र तब्बल ७७ वर्षांपूर्वीही होते. महाराष्ट्राच्या घराघरात राम कथांच्या आगळ्या वेगळ्या सादरीकरणाने श्रोतृ वर्गाला मोहीत केले होते. हा कालखंड होता गीत रामायणाचा. गीत रामायण हा रामायणाच्या कथांवर आधारित ५६ गीतांचा संग्रह आहे. या गीतांचे सर्वप्रथम प्रसारण १९५५-५६ मध्ये पहिल्यांदा ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी, पुणे यांनी केले. गीत रामायण हे ग. दि. माडगूळकर यांनी शब्दबद्ध केले होते तर सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले होते. गीत रामायण हे त्याच्या उत्कृष्ट शब्द, संगीत आणि गायनासाठी प्रसिद्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा