सध्या सगळीकडे एक प्रकरण भलतंच गाजत आहे, मीडिया, सोशल मीडिया.. सर्वांनाच सीमा हैदर प्रकरणाने पछाडलं आहे. सीमा हैदर नावाची कुणी एक पाकिस्तानी बाई आपल्या चार मुलांसोबत आपल्या प्रियकरासाठी भारतात येते. इतकंच नाही तर भारतात येण्यासाठी भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमा अवैध मार्गाने ओलांडते आणि त्या देशांना कळतही नाही. तिची चार मुले आणि ती असे पाच पाकिस्तानी नागरिक अवैध मार्गाने भारतात येतात. केवळ येतात एवढेच नव्हे तर इथे कायमस्वरूपी वास्तव्य करतात… विशेष म्हणजे प्रशासनाला जाग येण्यापूर्वी भारतीय मीडिया आणि स्थानिक त्यांना सेलिब्रेटी ठरवतात. या सगळ्या प्रकरणाला एक गोंडस नावं दिल जात ते म्हणजे प्रेमाचं – ‘गदर’ एक प्रेम कहाणी या चित्रपटाचा दाखला देवून ही बाई भारतात शिरते. या देशात तिचे मोठ्या जल्लोषात आदरातिथ्य होत आहे. या प्रसंगामुळे प्रश्न इतकाच पडतो की भारताच्या सीमा खरंच सुरक्षित आहेत का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा