२७ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय कथाकथन दिवस म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, स्कॉटलंड आणि युनायटेड किंगडम या देशांमध्ये साजरा केला जातो. २००९ पासून साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचा मुख्य उद्देश हा आपल्याकडील ज्ञान, अनुभव दुसऱ्याला सांगणे आणि अन्य लोकांचे अनुभव, कथा ऐकणे.  कथा सांगणे हेही एक कौशल्य आहे. कथा तयार करणे, ती व्यवस्थित रित्या मांडता येणे आणि समोरच्याला ती ऐकावीशी वाटणे, हा खरंतर कौशल्याचा भाग असतो. या कथा मग आपल्या जीवनातील असतील, पुस्तकातील असतील, साठवणीतल्या असतील. कथांद्वारे प्रबोधन आणि एकत्रित वेळ देणे हे या दिवसाचे प्रयोजन म्हणता येईल. आता हा दिवस जरी परदेशात साजरा होत असला तरी या अनुषंगाने कथाकथनाच्या विस्तृत इतिहास समजून घेणे, औत्सुक्याचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कथेचा उगम

कथेचे मूळ उगमस्थान हे भारतातच आढळते. सर्वसामान्यपणे वैदिक साहित्य हे प्राचीन आणि सर्वात पहिले साहित्य मानले जाते. ऋग्वेद हा आद्य वेद असून त्याला प्रथम साहित्यकृतीचा मान आहे. ऋग्वेदापासून कथेचा जन्म झालेला दिसतो. ऋग्वेदामध्ये आढळणारी संवादसूक्त ही कथाबीजे आहेत. यम-यामी संवादसूक्त, सरमा-पणि संवादसूक्त, विश्वामित्र-नदी संवादसूक्त हे संवाद कथेची उगमस्थाने आहेत. आख्यानकाव्यांची परंपराही ऋग्वेदापासून सुरू झालेली दिसते. इंद्राच्या पराक्रमाचे वर्णन करणारी सूक्ते, वरूण देवतेची महती सांगणारी सूक्ते ही आख्यानकाव्याची सुरुवात आहे. संवादसूक्तांचे विस्तृत स्वरूप म्हणजे ही  सूक्ते आहेत. या सूक्तांमध्ये काही सामाजिक सूक्तेही दिसतात. जसे अक्षसूक्त (१०.३४) द्यूत खेळून ओढवणाऱ्या सामाजिक आणि वैयक्तिक आपत्तींवर हे सूक्त भाष्य करते. यामध्ये सूक्त रचणारा स्वानुभव कथन करून लोकांनी द्यूत खेळू नये, यासाठी विनंती करत आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share your thoughts vvk
Show comments