गेल्या पाच वर्षात मुंबईची लोकसंख्या साडेचार लाखाने वाढली असली तरी सुमारे ११ लाख मतदारांची संख्या घटली आहे. त्यामुळे हे घटलेले मतदार कोणाच्या पथ्यावर पडतात याकडे लक्ष वेधले आहे. महापालिकेच्या २२७ वॉर्डासाठी २२७५ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईची सध्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ इतकी आहे. तर मतदार संख्या ९१ लाख ८० हजार ४९७ आहे त्यात पुरूषांची संख्या ५० लाख ३० हजार ३६३ तर स्त्रीयांची संख्या ४५ लाख ६६ हजार २७३ आहे. मागील पाच वर्षात म्हणजेच २०१२ मध्ये हीच लोकसंख्या १ कोटी १९ लाख ७८ हजार ४५० इतकी होती. गेल्या पाच वर्षात साधारण ४ लाख ६३ हजार ९२३ इतकी लोकसंख्या वाढली आहे. मात्र मतदार संख्या ११ लाख ६ हजार ८२ इतकी घटली आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी बोगस मतदानाच्या तक्रारी पुढे आल्याने निवडणूक आयोगाकडून बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये सर्वेक्षण करून निवडणूक आयोगाकडून मुंबईतील ११ लाख नावे रितसर कमी करण्यात आली. ही नावं मतदार यादीत बोगस ठरत असल्याचे पुढे आल्याने आयोगाकडून संबंधित मतदारांना आपल्या माहितीची आणि नाव नोंदणीसाठीची मुदत देखील देण्यात आली होती. पण संबंधितांकडून कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने अखेर निवडणूक आयोगाने रितसर नावे कमी केली होती. मात्र, मतदारांना आज मतदान करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतचा खुलासा देण्यात आला असला तरी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून स्थायिक असतानाही मतदार यादीतून नावं वगळण्यात आल्याने नागरिक संतापले आहेत.

60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
our sentenced to life imprisonment for robbeing Pune District Central Bank branch
पुणे : जिल्हा मध्यवर्ती बंँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना जन्मठेप
Nitesh rane
बुलढाणा : नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीसाठी भर पावसात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर!
possibilities of BJP lose five seats in Marathwada because of ajit pawar NCP
मराठवाड्यात भाजपच्या वाट्याच्या पाच जागा कमी होण्याची शक्यता
Administrative approval for road works affected by heavy rain Funding in Vikramgarh Assembly Constituency Palghar
पालघर: पाऊस सर्वत्र मात्र अतिवृष्टी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातच !
Lok Sabha Elections Shrikant Shinde Navi Mumbai Municipal budget State Government
केवळ १४ गावांचा अर्थसंकल्पाच्या दुप्पट भार
Shiv of Mumbai Mandal of MHADA was given to Mumbai District Central Bank for construction of Sahakar Bhawan at Pratishka Nagar Mumbai news
भूखंडाच्या बदल्यात म्हाडाला २५ कोटींची जागा

 

गेल्या पाच वर्षात मराठी माणूस मुंबईतून स्थलांरीत झाला असून, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आदी परिसरात विसावला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घटलेल्या मतदारांमध्ये मराठी टक्का मतदार किती आहे हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे घटलेल्या मतांचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होतो हे २३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे. नवीन वॉर्ड पुनर्रचनेत शहरातील सात वॉर्ड कमी झाले आणि त्यापैकी पाच पश्चिम उपनगरात, तर दोन पूर्व उपनगरांमध्ये वाढले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शहर आणि उपनगरांमधील लोकसंख्येत झालेल्या चढ-उतारामुळे वॉर्डात फेरबदल झाले आहे. पूर्वीचे ३० ते ३५ हजार मतदारांचे वॉर्ड आता ५४ हजारापर्यंत वाढले आहेत. वार्डाच्या फेररचनेमुळे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून त्याचा फटका सर्वच पक्षांना बसणार आहे.