आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे तेही जांबोरी मैदानात. एकेकाळी जांबोरी मैदान आणि दंहीहंडीचे मेगा आयोजन असं सचिन अहिर यांच्याबाबतीत एक समीकरण तयार झालं होतं. मुंबईतील सर्वात मोठी आणि विविध मोठ्या बक्षिसांसाठी सचिन अहिर यांनी आयोजित केलेला जांबोरी मैदानातला दहीहंडी उत्सव ओळखला जायचा. पण यावेळी हे मैदान आधी बुक करत भाजपाने बाजी मारली आहे.

भाजपाच्या आमादरांतर्फे विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जात आहे. यामध्ये काही वर्षांपूर्वी मुंबई भाजपाचे अध्यक्ष असतांना आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातला दहीहंडी उत्सव एक आकर्षण ठरला होता. आमदार राम कदम यांचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन हे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष झालेल्या आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मुंबई भाजपातर्फे मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत सचिन अहिर आणि शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमदार सचिन अहिर यांना दहिहंडी उत्सवासाठी दुसरी जागा शोधावी लागली आहे.

Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Dhananjay Munde
“पहाटेची शपथ घेऊ नका असं सांगितलेलं तरी…”, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

हेही वाचा … Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

यानिमित्ताने वरळीत ताकद दाखवण्याचा आणि मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. या मतदारसंघात भाजपाची मर्यादीत का होईना ताकद असून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय मते भाजपाच्या उमेदवाराला मिळाली होती. तेव्हा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत आधी पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त वॉर्ड आणि नंतर वरळी विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपाने प्रयत्न करायला सुरुवात केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Story img Loader