मुंबई : राज्यातील वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.८ टक्के म्हणजे २४ लाख वाहने वाढली असून त्यामध्ये विद्युत वाहनांची संख्या सुमारे एक लाख ९३ हजार इतकी आहे. करोनानंतरच्या कालखंडात विमान प्रवासामध्येही भरीव वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या दुप्पटीने वाढली आहे.

राज्यात मोटारींची संख्या ७.३ टक्क्यांनी वाढली असून दुचाक्यांची संख्या ५.५ टक्क्यांनी वाढली आहे. राज्यात सध्या ६६ लाख ३२ हजार मोटारी तर तीन कोटी १५ लाख दुचाक्या आहेत. करोनानंतरच्या काळात राज्यात रुग्णवाहिकांच्या संख्येतही २०२२च्या तुलनेत साडेअकरा हजाराने वाढ झाली असून सध्या एक लाख सहा हजार रुग्णवाहिका आहेत. राज्यातील विमानतळांवरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासामध्ये दुप्पटीने वाढ झाली असून २०२१-२२ मध्ये ही संख्या अनुक्रमे दोन कोटी ४५ लाख व ३२.१२ लाख इतकी आहे, तर ती गेल्या वर्षी अनुक्रमे एक कोटी ३३ लाख आणि १२.२३ लाख इतकी होती. करोना निर्बंध शिथिल झाल्यावर विमान प्रवासामध्ये दुप्पटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बंदरांमधून सुमारे १८८४ लाख मे.टन मालवाहतूक झाली व ती आधीच्या वर्षी १५७९ लाख मे. टन इतकी होती.

Maharashtra assembly muslims
मावळतीचे मोजमाप: अल्पसंख्यांकांचे प्रश्न; राज्यातील अल्पसंख्यांकांच्या समस्यांबद्दल विधानसभा उदासीन
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
Zika cases continue to rise in Pune More pregnant patients
पुण्यात झिकाने पुन्हा काढले डोके वर! रुग्णसंख्येत वाढ सुरूच; रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक
Sensex falls due to rising tensions in Gulf countries and equity sell off
समभाग विक्रीच्या तुफान माऱ्याने सेन्सेक्स ८२ हजारांखाली
dengue-malaria in Bhayander number of patients quadrupled within a month
पिंपरीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; १७,५०० घरांमध्ये सापडल्या अळ्या
infrastructure growth slips in august
पायाभूत क्षेत्रांच्या वाढीला घरघर; साडेतीन वर्षात पहिल्यांदाच नकारात्मक; ऑगस्टमध्ये उणे १.८ टक्क्यांपर्यंत अधोगती
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..

औष्णिक ऊर्जानिर्मिती वाढणार
’राज्यातील औष्णिक ऊर्जानिर्मितीत वाढ होत असून महानिर्मिती कंपनीच्या भुसावळ येथील केंद्रात ६६० मेगावॉटच्या संच उभारणीचे काम सुरू असून कोराडी येथील केंद्रात १३२० मेगावॉटच्या संचांची उभारणी केली जाणार आहे.’राज्यात ३१ मार्च २०२२ अखेपर्यंत ४५.८६ लाख कृषीपंपांचे विद्युतीकरण झाले असून त्यानंतर डिसेंबर २०२२ अखेरीपर्यंत ३६,३८१ कृषीपंपांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. महावितरणच्या उपकेंद्रावर किंवा लगतच्या क्षेत्रात सौर प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असून २०२२-२३ मध्ये डिसेंबर अखेपर्यंत ५४८ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, तर १५०९ मेगावॉट वीज खरेदीचे करार करण्यात आले आहेत.