नवी दिल्ली : जलशक्ती मंत्रालयाच्या निधीत गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के वाढ करण्यात आली आहे. २०२१-२२ मध्ये ६९ हजार ५२ कोटी रुपयांची तरतूद या खात्यासाठी केली होती. ती यंदाच्या अर्थसंकल्पात ८६ हजार १८९ कोटी रुपयांवर नेली आहे. यापैकी ६७ हजार २२१ कोटी पाणीपुरवठा आणि मलनि:सारण योजनांसाठी तर १८ हजार ९६७ कोटी ८८ लाख रुपये हे जलस्रोत, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन योजनेसाठी वापरला जाईल. घरोघरी नळजोडणी.. ’ २०२२-२३ या वर्षांत ३.८ कोटी घरांना नळजोडण्या देण्यासाठी ६० हजार कोटी. ’ जल जीवन मिशनअंतर्गत २०२१-२२ साठी ५० हजार कोटी. आतापर्यंत ग्रामीण भागातील ८.७ कोटी घरांत नळजोडण्या. ’ केंद्राच्या अखत्यारीतील योजनांसाठीचा निधी ५,६८८ कोटी ४९ लाखा रुपयांवरून १२,६०५ कोटी १२ लाखांवर. ’ नद्यांच्या जोडणी प्रकल्पासाठी १,४०० कोटी. ’ जलस्रोत व्यवस्थापन योजनांच्या निधीत गतवर्षीच्या ७२९ कोटींवरून यंदा २,११२ कोटी रुपयांपर्यंत वाढ.