Budget 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत देशात सत्ता स्थापन केली आहे. मोदी यांच्या तिसऱ्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी २०५) सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गरीब व मध्यमर्गीयांसाठी अनेक योजना सादर केल्या. वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद जाहीर केली. नव्या सरकारने शिक्षण क्षेत्रालाही महत्त्व दिलं आहे. अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या, “गेल्या १० वर्षांत देशातील २३ आयआयटींमधील विद्यार्थी क्षमता ६५ हजाराहून १.३५ लाखांपर्यंत वाढली आहे. ही वाढ १०० टक्के इतकी आहे. २०१४ नंतर सुरू झालेल्या पाच आयआयटींमध्ये अतिरिक्त सोयी-सुविधा उभारल्या जाणार आहेत. पाटणा आयआयटीमधील हॉस्टेल सुविधाही वाढवल्या जातील. दरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा