नवी दिल्ली : वाढत्या लठ्ठपणाबद्दल आणि उच्च साखर आणि मेदयुक्त प्रक्रिया केलेल्या खाद्यापदार्थांच्या (जंक फूड) वाढत्या उपभोगाबद्दल चिंता व्यक्त करत, आर्थिक पाहणी अहवालाने देशातील एकूण आजारांपैकी ५४ टक्के आजार हे आहाराच्या वाईट सवयींचा परिणामांमुळे असल्याचे नमूद केले आहे.

देशातील कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्येच्या आहार आणि आचरणाच्या वाईट सवयींचे प्राणघातक मिश्रण सार्वजनिक आरोग्य आणि उत्पादकता कमी करू शकते. शिवाय भारताच्या आर्थिक क्षमतचेही नुकसान होऊ शकते, असा इशारा अहवालाने दिला आहे.

pediatricians observation in diseases in children
धक्कादायक… विविध आजारांच्या लक्षणांमध्ये बदल; बालरोगतज्ज्ञ म्हणतात, “करोनापश्चात…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Blood purification center, Kama Hospital,
मुंंबई : जी. टी. आणि कामा रुग्णालयातही रक्तशुद्धीकरण केंद्र
Loksatta lokshivar Decline in production due to root rot of ginger and turmeric crops
लोकशिवार: आले, हळदीची कंदकुज !
9.48 lakh customers in Vidarbha zero electricity payment from Mahavitraan
९.४८ लाख ग्राहकांना शून्य वीज देयक! ‘ही’ आहे योजना…
car during Diwali Important tips
दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होऊ शकते तुमच्या गाडीचे नुकसान; सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स
healthy liver: 1-3 of 10 Indians have liver disease, says health ministry; here’s how to ensure you’re safe
Liver health: दहा पैकी तीन लोकांमध्ये यकृताची समस्या; कशी काळजी घ्याल स्वत:ची? जाणून घ्या
High Cholesterol Level in Youth Invites Future Heart Disease
तरुणांमधील उच्च कोलेस्टेरॉल पातळी देते भविष्यातील हदयविकारांना आमंत्रण!

हेही वाचा >>> अर्थ आकांक्षांना मुरड! विकासदराबाबत सावध अंदाज; कृषी, रोजगार, जागतिक अस्थिरतेचे अडथळे

जंक फूडच्या सेवनांतील वाढ, कमी शारीरिक हालचाली, संतुलित आहाराचा अभाव, लठ्ठपणाच्या समस्या वगैरे बाबी तरुणाईचा घात करीत असल्याचे म्हटले आहे.

मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष आवश्यक

आर्थिक पाहणी अहवालामध्ये प्रथमच मानसिक आरोग्याच्या विषयावर विस्तृत आणि तपशीलवार चर्चा ने केली आहे. समाजातील मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे हे आरोग्य आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनांतून अत्यावश्यक आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यापेक्षा, मानसिक आरोग्य बिघडलेले असेल तर ते उत्पादकतेला प्रभावित करते, असे त्यात नमूद केले आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ च्या आकडेवारीचा हवाला देऊन, भारतात १०.६ टक्के प्रौढांना मानसिक विकारांनी ग्रासले आहे तर त्या विकारांसाठी योग्य ते उपचार न घेतले जाण्याचे प्रमाण ७० ते ९२ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे अहवालाने नमूद केले आहे.