देशातील सर्वसाधारण विमा क्षेत्रात आणखी काही कंपन्यांचा प्रवेश होऊ घातला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (इर्डा) नुकताच क्षेम जनरल इन्शुरन्स कंपनीला परवाना बहाल करण्यात आला असून, आयुर्विमा क्षेत्रात दोन कंपन्या मंजुरी मिळविण्याच्या उंबरठ्यावर असून, नियामकांकडून एकूण २० अर्जांवर विचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

‘इर्डा’चे अध्यक्ष देवाशीष पांडा यांनी फिक्की या उद्योग संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नुकताच परवाना देण्यात आलेल्या क्षेम जनरल इन्शुरन्स कंपनीबरोबरीने, चालू वर्षात क्रेडिट ॲक्सेस लाइफ आणि ॲको लाइफ या आयुर्विमा क्षेत्रातील दोन नवीन कंपन्यांना परवाना दिला गेला आहे.

Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
whatsapp special campaign focused on small businesses
छोट्या व्यवसायांवर केंद्रित ‘व्हॉट्सॲप’ची विशेष मोहीम
eco friendly development in navi mumbai city green building projects in navi mumbai
 नवी मुंबईत पर्यावरणप्रिय हरित बांधकांना चालना; ‘सीआयआय-आयजीबीसी’च्या ३० व्या केंद्राचे कार्यान्वयन
Will the quality of vistara services remain after merger with Air India
‘विस्तारा’च्या विलीनीकरणामुळे काय होणार? प्रवासी सेवेवर ‘एअर इंडिया’ची छाप पडेल का?
velankanni, passengers going to velankanni,
वेलांकन्नी येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
case registered against four sellers along with director of company in Pune for selling bogus fertilizer by Gujarat company
गुजरातच्या कंपनीकडून बोगस खत विक्री, पुण्यातील कंपनीच्या संचालकांसह चार विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
pune based software company indicus partnerhip with japan seiko solutions
पुणेस्थित इंडिकसची ‘सेको’शी भागीदारी

याआधी आयुर्विमा क्षेत्रासाठी नवीन कंपनीला परवाना २०११ मध्ये देण्यात आला होता. सध्या देशात २३ आयुर्विमा आणि ३३ सर्वसाधारण विमा कंपन्या कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०२३ अखेर या कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५९ लाख कोटी रुपये आणि त्यांचे विमा हप्ता मूल्य १० लाख कोटी रुपये होते. विमा हप्ता मूल्यात वर्षागणिक १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

सर्वांसाठी २०४७ पर्यंत विमा या उद्दिष्टाकडे फक्त घोषणा म्हणून विमा उद्योगाने पाहू नये. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात येण्यासाठी विमा उद्योगाने आतापासून पावले उचलावीत. – देवाशीष पांडा, अध्यक्ष, भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (इर्डा)