देशातील सर्वसाधारण विमा क्षेत्रात आणखी काही कंपन्यांचा प्रवेश होऊ घातला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (इर्डा) नुकताच क्षेम जनरल इन्शुरन्स कंपनीला परवाना बहाल करण्यात आला असून, आयुर्विमा क्षेत्रात दोन कंपन्या मंजुरी मिळविण्याच्या उंबरठ्यावर असून, नियामकांकडून एकूण २० अर्जांवर विचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

‘इर्डा’चे अध्यक्ष देवाशीष पांडा यांनी फिक्की या उद्योग संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नुकताच परवाना देण्यात आलेल्या क्षेम जनरल इन्शुरन्स कंपनीबरोबरीने, चालू वर्षात क्रेडिट ॲक्सेस लाइफ आणि ॲको लाइफ या आयुर्विमा क्षेत्रातील दोन नवीन कंपन्यांना परवाना दिला गेला आहे.

Sugar factories in financial trouble sugarcane shortage loans to be restructured Mumbai news
साखर कारखाने आर्थिक अडचणीत; उसाच्या तुटवडा, कर्जांची फेररचना होणार
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
IOCL Recruitment 2025 Apply for 246 Junior Operator
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी! ज्युनियर ऑपरेटरसह इतर पदासाठी २४६ पदांची भरती, जाणून घ्या…
Services sector hit by slowdown, PMI hits two-year low
सेवा क्षेत्राला गतिरोधाची बाधा ‘पीएमआय दोन वर्षांच्या नीचांकी
India Manufacturing PMI Hits Six-Month High in January
अर्थव्यवस्थेसाठी सुसंकेत, उत्पादन क्षेत्राला जानेवारीत दमदार गती; ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकी
IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
114 junior engineers in the mumbai municipal corporation will get promotion
महापालिकेतील ११४ कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नती होणार
municipal corporation issued notices to 5000 establishments with unauthorized constructions in Chikhli Kudalwadi
पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील पाच हजार लघुउद्योजकांना नोटीस; उद्योजकांचा एमआयडीसी बंद करण्याचा इशारा

याआधी आयुर्विमा क्षेत्रासाठी नवीन कंपनीला परवाना २०११ मध्ये देण्यात आला होता. सध्या देशात २३ आयुर्विमा आणि ३३ सर्वसाधारण विमा कंपन्या कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०२३ अखेर या कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५९ लाख कोटी रुपये आणि त्यांचे विमा हप्ता मूल्य १० लाख कोटी रुपये होते. विमा हप्ता मूल्यात वर्षागणिक १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

सर्वांसाठी २०४७ पर्यंत विमा या उद्दिष्टाकडे फक्त घोषणा म्हणून विमा उद्योगाने पाहू नये. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात येण्यासाठी विमा उद्योगाने आतापासून पावले उचलावीत. – देवाशीष पांडा, अध्यक्ष, भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (इर्डा)

Story img Loader