पीटीआय, नवी दिल्ली
नादारी आणि दिवाळखोरी कायद्यांतर्गत चालू आर्थिक वर्षात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत १,११९ प्रकरणांचे निराकरण झाले असून, त्यायोगे ३.५८ लाख कोटी रुपये थकबाकीची वसुली कर्जदात्या संस्थानी केली, अशी माहिती केंद्रीय कंपनी कामकाज राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल मल्होत्रा म्हणाले की, भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाच्या (आयबीबीआय) माहितीनुसार, २,७०७ प्रकरणांत मालमत्ता अवसायनाचा (लिक्विडेशन) निर्णय झाला आहे, तर डिसेंबर अखेरीस १,११९ प्रकरणांच्या निराकरणांतून वसुली झाली. त्यातून कर्जदात्या संस्थांना ३.५८ लाख कोटी रुपये परत मिळाले आहेत. याचबरोबर १,२७४ प्रकरणांमध्ये अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यातून १३ हजार कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.

central railways mega block at roha yard on tuesday will delay trains on Konkan route
कोकणातील गाड्या रखडणार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Payments of Rs 400 crores pending from contractor in Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटदार आर्थिक अडचणीत, ४०० कोटींची देयके प्रलंबित
Loksatta coverage on Mumbai BMC budget 2025 in marathi
रुपये ७४,४२७,४१,००० फक्त!, मुंबई महापालिकेच्या जवळपास पाऊण लाख कोटींच्या अजस्र अर्थसंकल्पातून होणार काय?
bmc debts for various major projects exceeded rs 2 lakh 32 thousand crores
महापालिकेची देणी मुदतठेवींच्या तिप्पट; २ लाख ३२ हजार कोटींचा खर्च, ३५ हजार कोटींची तरतूद
Konkan Railway schedule updates in marthi
कोकणातील रेल्वेगाड्या आता दादरपर्यंत; सीएसएमटी फलाट १२, १३ चे विस्तारीकरण; २८ फेब्रुवारीपर्यंत नियोजन
census delay by Modi government due to low fund provision
जनगणना आणखी लांबणीवर? १२ हजार कोटींची गरज असताना केवळ ५७५ कोटींची तरतूद
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने

अशा प्रकरणांमध्ये पाणी सोडून द्यावी लागलेली रक्कम अथवा माफी केलेल्या रकमेची नोंद केली गेली नसल्याचे सांगून मल्होत्रा म्हणाले की, नादारी आणि दिवाळखोरी कायद्यातील प्रक्रिया ही बाजारपेठेशी निगडित आहे. ती दिवाळखोरी प्रक्रियेवेळी मालमत्तेची गुणवत्ता आणि त्यानुसार मिळू शकणाऱ्या मूल्यावर अवलंबून असते. त्यामुळे या प्रक्रियेतून वसूल होणाऱ्या मूल्यावर कोणतीही मर्यादा नसते. या प्रक्रियेअंतर्गत बँकांनी किती पैसे मिळाले याचीही माहिती ठेवली जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader