चंद्रावर पोहोचण्याच्या भारताच्या यशाचा देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर बीबीसीचा चांद्रयान कव्हर करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडीओ २०१९ चा असल्याचं सांगितलं जात आहे, जेव्हा भारताने चांद्रयान २ मोहीम सुरू केली होती. या व्हिडीओमध्ये बीबीसी अँकर रिपोर्टरला विचारतो की, ज्या देशात करोडो लोकांना टॉयलेटही उपलब्ध नाही, अशा देशाने अंतराळ कार्यक्रमावर शेकडो कोटी रुपये खर्च करावेत? असं तो अँकर म्हणालाय, यावरून बीबीसीवर टीका होत आहे. चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

खरं तर हा व्हिडीओ चांद्रयान मिशन २ च्या काळातील असला तरी लोक बीबीसीच्या त्या प्रश्नांवर आता टीका करीत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीसुद्धा आता एका लांबलचक ट्विटमधून बीबीसीच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले असून, भारताच्या गरिबीसाठी ब्रिटनला जबाबदार धरले आहे. याबरोबरच हे मिशन आमच्या सन्मानाचे आहे. आता भारत अशा गरिबीतून बाहेर पडत आहे. ते म्हणाले की, ब्रिटनने आमच्या इथल्या आकांक्षा काढून घेतल्या आणि आम्हाला गरीब देशात बदलून सोडले.

lon Musk Ambani government role in allocating spectrum for SATCOM print eco news amy 95
‘सॅटकॉम’साठी स्पेक्ट्रम वाटपाच्या सरकारच्या भूमिकेने अंबानींविरोधात मस्क यांना झुकते माप
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
Indian warships at iran port
विश्लेषण: इस्रायल-इराण तणावात भारतीय युद्धनौका इराणच्या बंदरात… नक्की काय घडतंय?
PM Modi visit Thane on Saturday Mahayutti office bearers defaced Ghodbunder with placards
पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी
amit kumar dalit student iit
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानं दलित विद्यार्थ्यासाठी ‘IIT’चे दार खुले; नेमकं प्रकरण काय? कोण आहे अतुल कुमार?
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला

हेही वाचाः Money Mantra : श्रीमंत व्हायचंय, मग गुंतवणुकीसाठी ‘या’ तीन नियमांचे पालन करा

‘ब्रिटनने आम्हाला योग्य प्रकारे लुटले आणि आम्हाला गरिबीत सोडले’

आनंद महिंद्रा यांनी लिहिले, ‘सत्य हे आहे की अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीने भारतातील गरिबी वाढवण्यास हातभार लावला, ज्याने संपूर्ण भारतीय उपखंडातील बरीच संपत्ती लुटली. आमच्याकडून लुटण्यात आलेली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे कोहिनूर हिरा नव्,हे तर आमचा स्वाभिमान आणि आमच्या क्षमतेवर असलेला विश्वास आहे. याचे कारण असे की, वसाहतवादी सत्तेचे उद्दिष्ट म्हणजे सत्ता गाजवलेल्या लोकांना कनिष्ठ असल्याचे दाखवले. म्हणूनच आपण शौचालय आणि अवकाश संशोधन या दोन्हींवर खर्च करणे महत्त्वाचे आहे. यात कोणताही विरोधाभास नाही.

हेही वाचाः Money Mantra : पॅन कार्ड बंद झाल्यास पगार मिळण्यात काही अडचण येईल का? तज्ज्ञ म्हणतात

चंद्राच्या प्रवासातून आमचा आदर आणि स्वाभिमान परत आला

महिंद्राने ट्विटमध्ये पुढे लिहिले की, ‘चंद्रावर प्रवास करून आमचा सन्मान आणि स्वाभिमान परत आला आहे. यामुळे विज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीचा आत्मविश्वास मिळाला आहे. हे आपल्याला गरिबीच्या वर येण्याची आकांक्षा देते. आकांक्षांची गरिबी ही सर्वात मोठी गरिबी आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलेय.