शिक्षण आणि तंत्रज्ञान कंपनी बायजूने आपल्या पुनर्रचना प्रक्रियेचा भाग म्हणून विविध विभागांमधील सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. नोकर कपात केलेले कर्मचारी वेगवेगळ्या विभागातील आहेत.

बायजूने सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

बायजूने सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. नवीन कर्मचार्‍यांच्या समावेशासह कंपनीची एकूण कर्मचारी संख्या ५०००० च्या आसपास आहे. नवीन नोकरकपात कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे दोन टक्के आहे. एक अब्ज डॉलर्सच्या कर्जफेडीवरून अमेरिकेच्या न्यायालयात कायदेशीर वाद सुरू असताना कंपनीतील टाळेबंदीला सुरुवात झाली आहे.

Zomato CEO makes new revelation regarding recruitment of Chief of Staff
‘चिफ ऑफ स्टाफ’च्या भरतीबाबत झोमॅटोच्या सीईओनी केला नवा खुलासा! वाचा काय म्हणाले दीपिंदर गोयल?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
Notices issued to 400 employees for absenteeism on Republic Day Legislative Secretariat takes action Mumbai new
प्रजासत्ताकदिनी गैरहजर ४०० कर्मचाऱ्यांना नोटीस, विधिमंडळ सचिवालयाची कारवाई
US-based company shuts down without notice Mass layoffs
Mass layoffs : अमेरिकेतील कंपनीने पूर्वसूचना न देता गुंडाळलं भारतातील कामकाज! हजारो कर्मचार्‍यांना मिळाले नोकरीहून काढल्याचे ईमेल
Eight workers died in a Bhandara ordnance factory explosion leading to attack on officials by workers and family
भंडारा आयुध निर्माणीतील स्फोट,संतप्त कामगार, कुटुंबियांकडून अधिकाऱ्यांना घेराव आणि मारहाण
bhandara jawahar nagar ordnance factory blast update eight dead
भंडारा स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू, प्रशासनाकडून चार जणांची नावे जाहीर
Illustration showing Indian companies facing challenges in hiring skilled talent.
Unskilled Employees : भारतातील ८० टक्के कंपन्यांना मिळेनात कुशल कर्मचारी, आयटी आणि आरोग्य क्षेत्रासमोर आव्हानांचा डोंगर

बायजू यांनी आधीच टाळेबंदीचे संकेत दिले होते

ऑक्टोबर २०२२ पासून पुढील सहा महिन्यांत सुमारे २५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू, असे संकेत बायजूने आधीच दिले होते. अलीकडील टाळेबंदी हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: बाजारातून ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब; आता RBI म्हणते…

फेब्रुवारीमध्ये सुमारे १५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

यंदा फेब्रुवारीमध्ये बायजूने सुमारे १५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. यामध्ये प्रामुख्याने डिझाइन, अभियांत्रिकी आणि उत्पादन व्हर्टिकलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बायजूने सुमारे २५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, जे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के होते. बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते की, नियोजित २५०० कर्मचाऱ्यांच्या पलीकडे कोणतीही टाळेबंदी केली जाणार नाही. त्यानंतर आता कंपनी ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, कस्टमर केअर, इंजिनिअरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स आणि इतर क्षेत्रातील काही फंक्शन्स आउटसोर्स करण्याचा विचार करीत आहे.

हेही वाचाः ज्याला गुगलने नाकारले, त्याने मित्राबरोबर मिळून उभारली देशातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी, आज दोघेही अब्जाधीश

Story img Loader