आर्थिक संकटातून जात असलेल्या भारतीय एडटेक कंपनी बायजूने आपल्या कर्जदारांना पैसे परत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कंपनीने ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १.२ बिलियन डॉलरचे संपूर्ण कर्ज फेडण्याची ऑफर दिली आहे, भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम ९९४७ कोटी रुपये आहे.

दुरुस्तीचा प्रस्ताव स्वीकारल्यास कंपनी ३०० दशलक्ष डॉलर संकटग्रस्त कर्जाची परतफेड ३ महिन्यांत करण्याची आणि उर्वरित रक्कम पुढील ३ महिन्यांत परत करण्याची ऑफर देत आहे. इकोनॉमिक्स टाइम्सला एकाने खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ते म्हणाले की, कर्जदार प्रस्तावाचे पुनरावलोकन करीत आहेत आणि परतफेड कशी केली जाईल, याबद्दल अधिक माहिती घेत आहेत.

navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
MHADAs Mumbai Board of Housing applications deadline extended by 12 hours
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांचे अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्ज भरण्यासाठीची मुदत १२ तासांनी वाढवली
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
Forfeiture action by Vasai virar Municipal corporation against property owners who keep arrears of property tax
मालमत्ता थकबाकीदारांना पालिकेचा दणका; पालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरवात
appoint developers to construct houses in slum Redevelopment Mumbai news
दोन लाख झोपु घरांची जबाबदारी पुन्हा विकासकांवरच?
Supreme Court directs Sahara Group to deposit Rs 1000 crore
सहारा समूहाला १,००० कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; मुंबई जमीन विकसित करण्यासाठी संयुक्त भागीदारीस परवानगी
Mahavitaran electricity customers increased adding 74 thousand new electricity connection in two years
महावितरणचे वीज ग्राहक वाढले, दोन वर्षात ७४ हजार नवीन वीज जोडण्या

हेही वाचाः विश्लेषण: निफ्टी २० हजारांच्या पार, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चिंता नाही

कंपनी आणि कर्जदार यांच्यात वाद सुरू

बायजू आणि त्याचे सावकार जवळपास वर्षभरापासून वादात अडकले आहेत. या काळात कर्ज कराराच्या वाटाघाटींच्या अनेक फेऱ्या अयशस्वी झाल्या. कंपनीने तिच्या मुदत कर्जावर व्याज न देण्याचा निर्णय घेतला, जे जागतिक स्तरावर स्टार्टअपच्या सर्वात मोठ्या कर्जांपैकी एक आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितले की, कंपनीने लवकर निराकरणासाठी सुधारित प्रस्ताव लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी करार होणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. भारतातील २२ अब्ज डॉलर किमतीचे सर्वात मौल्यवान स्टार्टअप पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोठ्या व्यापक मोहिमेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हेही वाचाः संदीप बक्षी पुन्हा ICICI बँकेचे पुढील ३ वर्षांसाठी एमडी, RBI कडून मंजुरी

बायजू आर्थिक संकटातून जातेय

तसेच कर्जदारांच्या प्रतिनिधीने कंपनीच्या परतफेडीच्या प्रस्तावाबाबत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. बायजूच्या प्रवक्त्याने टिप्पणीच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही. एडटेक कंपनी बायजू गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटातून जात आहे. गेल्या वर्षी जेव्हा सप्टेंबर २०२२ मध्ये आर्थिक आकडेवारी जाहीर झाली, तेव्हा कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली. २०२१ च्या आर्थिक वर्षात Byju चे ४५८९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या डेटावरून समोर आले आहे. एवढेच नाही तर त्यांचे उत्पन्नही ३० टक्क्यांनी घसरून २४२८ कोटी रुपयांवर आले आहे. याशिवाय बायजूला कॉर्पोरेट गव्हर्नन्स, अकाउंटिंगमधील अनियमितता आणि मोठ्या प्रमाणात टाळेबंदी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.