नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात, कृषी उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा. यामुळे पुरवठा साखळीत सुधारणा होऊन खाद्यवस्तूंच्या भावातील अस्थिरता कमी होऊ शकेल, असा सल्ला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्या अशिमा गोयल यांनी सोमवारी दिला.  

हेही वाचा >>> टाटा म्युच्युअल फंडाकडून देशातील पहिला ‘टुरिझम इंडेक्स फंड’

AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
kalyani strategic systems collaborates with us defence companies
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल
cabinet nod to acquire 256 acres of salt pan land for Dharavi housing scheme
मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्त; २५६ एकर जमिनीवर पुनर्वसनासाठी इमारती बांधण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
Loksatta pahili baju What is the next step of Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana
पहिली बाजू: आयुष्मान भारत : सर्वसमावेशक सेवेसाठी!
1200 acre land near vadhvan port
बड्या उद्योगासाठी ‘एमआयडीसी’कडून भूसंपादन? वाढवण बंदराजवळील १२०० एकर जमिनीची वस्त्रोद्योग केंद्रासाठी निवड
CID , MIDC, Konkan, Bal mane, Uday Samant,
कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप

गोयल म्हणाल्या की, विकासाचा वेग वाढत असून, महागाई दरात निरंतर घसरण कायम आहे. स्थिर सरकार पुन्हा सत्तेत आल्याने देशाच्या हितासाठी पतधोरण आणि वित्तीय धोरणाचा योग्य समन्वय साधता येईल. अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे व्यवहार्य सुधारणा करून पुरवठा साखळी आणखी चांगली करणे, तंत्रज्ञानाचा वापर आणि तरूणांचा संधी देणे या गोष्टी करता येतील. सरकारने आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि पायाभूत सुविधा यावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा >>> शेअर्सच्या किमतीत तब्बल ३०० टक्के वाढ, पहिल्या तिमाहीतील विक्रीपूर्व उत्पन्नही २५५ टक्क्यांनी वाढलं; ‘या’ कंपनीची दमदार कामगिरी!

खाद्यवस्तूंच्या भावातील अस्थिरता कमी करण्यासाठी कृषी उत्पादकता वाढविणे आणि पुरवठा साखळी भक्कम कऱण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्राला राज्यांसोबत योग्य समन्वय ठेवावा लागेल. गेल्या काही वर्षात योग्य पतधोरणामुळे महागाई कमी होतानाच विकास दर वाढण्यास मदत झाली आहे. महागाईचा दर दीर्घ काळ नियंत्रणात येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे पतधोरण समितीच्या बहुतांश सदस्यांचे मत आहे, असे गोयल यांनी सांगितले.

केंद्रातील आघाडी सरकारमधील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही विकासासाठी कटिबद्ध आहेत. एनडीए सरकारच्या प्राथमिक उद्दिष्टाशी सुसंगत त्यांची भूमिका आहे. राजकीय स्थिरतेमुळे सरकारला दीर्घकालीन धोरण आखता येईल. – अशिमा गोयल, सदस्य, पतधोरण समिती, रिझर्व्ह बँक