तैवान भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी दिवाळी भेट देत आहे. या भेटीमुळे चीनला खूप वाईट वाटू शकते. खरं तर तैवान भारतातील एक लाखाहून अधिक लोकांना नोकऱ्या देणार आहे. हा करार झाल्यास भारत आणि तैवानमधील आर्थिक संबंध आणखी घट्ट होऊ शकतात. दुसरीकडे तैवानचा शेजारी देश चीन अडचणीत येऊ शकतो. अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तैवान १००,००० हून अधिक भारतीयांना कारखाने, शेतात आणि रुग्णालयांमध्ये काम करण्यासाठी नियुक्त करू शकतो. डिसेंबरच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंनी नोकरीच्या करारावर स्वाक्षरी केली जाऊ शकते.

तैवानला कामगारांची गरज आहे

तैवानचे लोक सतत वृद्ध होत आहेत. त्यांना अधिकाधिक लोकांची गरज आहे. दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या तुलनेत वेगवान असली तरी श्रमिक बाजारात दरवर्षी लाखो नोकऱ्या निर्माण करणे पुरेसे नाही. असा अंदाज आहे की, २०२५ पर्यंत तैवान एक “सुपर वृद्ध” समाज बनेल, ज्यात वृद्ध लोक लोकसंख्येच्या पाचव्यापेक्षा जास्त असतील असा अंदाज आहे. भारत-तैवान जॉब डीलमुळे चीनबरोबर भू-राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनला कोणत्याही देशाने अधिकृतपणे तैवानशी कोणताही आर्थिक करार करावा असे वाटत नाही. चीन तैवानला आपलाच हिस्सा मानत आहे.

China is making huge fusion research facility
अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी चीनने तयार केले संशोधन केंद्र? याचा अर्थ काय? या घडामोडीमुळे भारतावर काय परिणाम?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
loksatta article on america budget 2025 26 and it change future of india
काय आहेत येत्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा…?
Loksatta anvyarth Is there a sign of India China relations
अन्वयार्थ: भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणांचे संकेत?
चीनच्या निर्मिती क्षेत्रात घसरण; जानेवारीत वेग मंदावला
Akola Amravati and Malegaon are main centers that issue certificates to Bangladeshis alleges Kirit Somaiya
“बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव मुख्य केंद्र,” किरीट सोमय्या यांचा आरोप
China built airport in Pak Gwadar starts operations
चीन कृपेने पाकिस्तानचा सर्वांत मोठा विमानतळ ग्वादरमध्ये…पण बंदर अजूनही रखडले? भारतासाठी काय इशारा?
tarkteerth lakshmanshastri joshi loksatta news
तर्कतीर्थ विचार : आंतरजातीय विवाह समर्थन

हेही वाचाः Money Mantra : दिवाळीपूर्वीच EPFO ​​खातेदारांना गिफ्ट, व्याजाचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात, ‘अशा’ पद्धतीनं बॅलन्स तपासा

चर्चा अंतिम टप्प्यात

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले की, भारत-तैवान जॉब डील आता अंतिम टप्प्यावर आहे. ब्लूमबर्गने संपर्क साधला असता तैवानच्या कामगार मंत्रालयाने भारताच्या करारावर विशेष भाष्य केले नाही, परंतु ते म्हणाले की, ते कामगार देऊ शकतील अशा देशांच्या सहकार्याचे स्वागत करतील. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तैवानला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय कामगारांचे आरोग्य पडताळण्यासाठी अद्याप एक यंत्रणा काम करीत आहे.

हेही वाचाः अभिनेता रणवीर सिंगने मुंबईतील दोन अपार्टमेंट विकल्या; ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला सौदा

या देशांमध्येही नोकरीचे व्यवहार सुरू आहेत

तैवानमध्ये जिथे बेरोजगारीचा दर २००० नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आला आहे, सरकारला त्याची ७९० अब्ज डॉलर अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी कामगारांची आवश्यकता आहे. हा करार अधिक चांगला करण्यासाठी तैवान भारतीय कामगारांना पगार आणि विमा पॉलिसी स्थानिकांच्या बरोबरीने देत आहे. भारत सरकार वृद्धत्वाचा सामना करत असलेल्या विकसित देशांबरोबर नोकरीच्या करारासाठी जोर देत आहे. यावर्षी भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. तज्ज्ञांच्या मते, भारत सरकारने आतापर्यंत जपान, फ्रान्स आणि यूकेसह १३ देशांशी करार केले आहेत. नेदरलँड, ग्रीस, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड यांच्याशीही अशीच व्यवस्था करण्याबाबत चर्चा केली जात आहे.

भारत आणि चीनमधील संबंध बिघडलेले

२०२० मध्ये सीमेवर झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण आहेत. गेल्या ४० वर्षांत दोघांमध्ये अशी परिस्थिती कधीच पाहायला मिळाली नाही. तेव्हापासून दोन्ही देशांनी हजारो सैनिक, शस्त्रास्त्रे आणि रणगाडे हिमालयीन भागात हस्तांतरित केले आहेत. दुसरीकडे तैवानच्या कंपन्या भारतात सातत्याने गुंतवणूक करीत आहेत. सेमीकंडक्टर उत्पादनात तैवान हा जगातील सर्वात मोठा देश आहे. आता तैवानही भारतात अशीच परिसंस्था निर्माण करण्यात मदत करत आहे.

Story img Loader