कांद्याचे भाव अजूनही कमी झालेले नाहीत. आता लसणाच्या भावाने सर्वसामान्यांचे बजेट बिघडू लागले आहे. देशातील बहुतांश भागातील किरकोळ बाजारात गेल्या ६ आठवड्यांत लसणाच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे भावाने किलोमागे २५० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे सरासरी घाऊक किंमत १३० ते १४० रुपये प्रतिकिलो आहे, तर उत्तम दर्जाचा लसूण घाऊक बाजारात २२० ते २५० रुपये किलो दराने विकला जात आहे. डिसेंबरमध्ये लसणाचे दर वाढण्याची शक्यता आहे. कमी पुरवठा हे त्याचे कारण आहे.

किमती आणखी वाढू शकतात

वेगवेगळ्या दर्जाच्या लसणाची किरकोळ किंमत १८० ते ३०० रुपये प्रति किलो आहे. तर घाऊक किमती १५० ते २६० रुपये प्रति किलोच्या दरम्यान दिसत आहेत. पुणे एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) घाऊक विक्रेते विलास भुजबळ यांनी सांगितले की, दरवर्षी या काळात लसणाचे भाव वाढतात. ज्याचे कारण कमी पुरवठा आहे. पुरवठ्याच्या समस्येमुळे आगामी काळात लसणाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

nashik Crowd management preparations for Kumbh Mela are based on Ramani Commissions reports
नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
central government raised purchase price of ethanol from C heavy molasses to Rs 57 97 per liter from Rs 56 58
इथेनॉल खरेदीच्या दरवाढीचे गाजर जाणून घ्या, केंद्र सरकारच्या निर्णयावर साखर उद्योग नाराज का
How is the number of Guillain Barré syndrome patients increasing in the Maharashtra state print exp
राज्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांमध्ये वाढ कशी? धोका किती? उपचार महागडा का?
Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
Many people including businessman were cheated of Rs 2 crore by promising double profits
दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यासह अनेकांना दोन कोटीचा गंडा
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
जीबीएसच्या रुग्णांत मोठी वाढ अन् एकाचा मृत्यू! रुग्णसंख्या शंभरपार; निम्म्याहून अधिक ‘आयसीयू’त
boom IT sector Sensex nifty
‘आयटी’तील तेजीने सेन्सेक्सची ५६६ अंशांनी वाढ; शेअर बाजाराचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे

हेही वाचाः सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला, बाजाराने पहिल्यांदाच ७० हजारांची पातळी ओलांडली

कांदा निर्यातबंदीमुळे संताप

कांद्यावरील निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढली आहे. कांदा निर्यातीवर अचानक बंदी घातल्याने आधीच दुष्काळ आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार घातला असून, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भाव ३० टक्क्यांनी घसरले आहेत. नोव्हेंबरमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने केंद्र सरकारने ८ डिसेंबरपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. काही बाजारात सर्वाधिक भाव ४५ रुपये किलोच्या वर गेले होते. बांगलादेश आणि नेपाळला होणारी कांद्याची निर्यात हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. त्यामुळे भावात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले.

हेही वाचाः IIT मध्ये प्लेसमेंट ३० टक्क्यांनी झाली कमी, नोकरीच्या चांगल्या ऑफर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं

नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळले

निर्यातबंदीनंतर शुक्रवारी लासलगाव बाजारात कांद्याचे सरासरी घाऊक भाव २५ रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरले, जे निर्यातबंदीपूर्वी ३५ रुपये किलो होते. तर नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठा बंद होत्या. रविवारी महाराष्ट्रातील इतर सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले, घाऊक व्यापारात किमान आणि कमाल भाव २५ रुपये प्रति किलो ते ४५ रुपये प्रति किलोदरम्यान आहेत.

Story img Loader