वृत्तसंस्था, पीटीआय

देशातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांतील मनुष्यबळात दुसऱ्या तिमाहीमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. नवीन कार्यादेशात घट होत असल्याने कंपन्यांकडून नवीन कर्मचाऱ्यांची भरती कमी झाले आहे. त्याऐवजी उपलब्ध मनुष्यबळाचाच पुरेपूर वापर करून घेण्याचे पाऊल या कंपन्यांनी उचलले आहे. इतरही कंपन्यांमध्ये सध्या असाच प्रकार सुरू आहे.

insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Ratan Tata, tata companies, global brand, Europe
विश्लेषण : युरोपातील बड्या कंपन्या काबीज करत रतन टाटांनी कसा साकारला… ‘टाटा’ द ग्लोबल ब्रँड?
Sensex falls due to rising tensions in Gulf countries and equity sell off
समभाग विक्रीच्या तुफान माऱ्याने सेन्सेक्स ८२ हजारांखाली
AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
kalyani strategic systems collaborates with us defence companies
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
Loksatta chip charitra Fables revolution chip Semiconductor chip manufacturing Morris Chang TSMC
चिप चरित्र: ‘फॅबलेस’ क्रांतीची नांदी

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांच्या एकत्रित मनुष्यबळात दुसऱ्या तिमाहीत १६ हजार १६२ एवढी घट झाली. त्यात टीसीएसच्या मनुष्यबळात ६ हजार ३३३ घट झाली असून, मागील पाच वर्षांतील ही सर्वांत मोठी घट आहे. इन्फोसिसच्या मनुष्यबळात ७ हजार ५३० ने घट झाली असून, एचसीएलचे मनुष्यबळ २ हजार २९९ ने कमी झाले आहे.

सर्वच कंपन्यांमध्ये मनुष्यबळ विभागप्रमुख हे उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पुरेपूर वापर करण्यावर भर देत आहेत. या कंपन्यांनी नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा न भरण्याची भूमिका घेतली आहे. या कंपन्यांतून कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण मागील वर्षभरात १४ टक्के आहे. नोकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार, यंदा नऊ महिन्यांत माहित तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकर भरतीत घट दिसून आली आहे. नवीन कार्यादेशात होणारी घट आणि अनिश्चित आर्थिक वातावरण यामुळे मागील काही तिमाहींमध्ये कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाणही घटले आहे.

आघाडीच्या तीन कंपन्यांची आकडेवारी

कंपनीमनुष्यबळ घटगळती दर
टीसीएस६,३३३१४.९ %
इन्फोसिस७,५३०१४.६ %
एचसीएल टेक२,२९९१४.६ %