वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेल चारचाकी वाहनांवर २०२७ पर्यंत बंदी आणली जाऊ शकते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या ऊर्जा स्थित्यंतर सल्लागार समितीने याबाबत शिफारस केली आहे. इलेक्ट्रिक आणि वायू इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे.

thane traffic police did not get Solid solution
ठाणे : वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना, नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवास नकोसा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
unauthorized hawkers, Andheri,
अंधेरीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा; परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी पालिकेची कार्यवाही
ST traffic disrupted in Nashik section due to agitation plight of passengers
आंदोलनामुळे नाशिक विभागात एसटी वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
low price to mung, soybean, mung price,
सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?
Mumbai, road works Mumbai,
मुंबई : रस्ते कामांसाठीच्या खर्चात मोठी वाढ, साडेआठ हजार कोटींवर खर्च; लवकरच कंत्राटदारांना कार्यादेश
Kalyan, Dombivli, online investment fraud, Information Technology Act, Manpada police, fraud news, latest news, stock market fraud,
डोंबिवली, कल्याणमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीतून सव्वा कोटीची फसवणूक
The first installment of the Ladki Bahin scheme will be distributed on Saturday August 17 Pune news
‘लाडक्या बहिणीं’साठी जिल्ह्यातील विकासकामांची गंगाजळी रोखली? योजनेचा पहिला हप्ता वितरित झाल्यानंतरच निधी वाटप

पेट्रोलियम विभागाचे निवृत्त सचिव तरुण कपूर यांच्या नेतृत्वाखालील समितीने याबाबतचा अंतिम अहवाल फेब्रुवारी महिन्यात सरकारला सादर केला आहे. सरकारने हा अहवाल अद्याप स्वीकारलेला नाही. या अहवालानुसार, एकल सिलिंडर इंजिन असलेल्या दुचाकी, स्कूटर आणि तीनचाकी २०३५ पर्यंत वापरातून टप्प्याटप्प्याने काढून टाकाव्यात. यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात यावे. सध्या इथेनॉलचे प्रमाण जास्त असलेल्या इंधनाच्या वापरास पाठबळ धोरण तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारावे.

आणखी वाचा-कोल इंडियाला मार्च तिमाहीत ५५०० कोटींहून अधिक नफा, बंपर लाभांश जाहीर

प्रवासी मोटारी आणि टॅक्सींसह चारचाकींना इलेक्ट्रिक आणि इथेनॉल व पेट्रोलचे प्रत्येकी ५० टक्के प्रमाण असेल अशा इंधनाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावेत. वाहने इलेक्ट्रिक आणि सीएनजीकडे १० ते १५ वर्षांपर्यंत वळवण्यासाठी पावले उचलावीत. शहरी भागांमध्ये १० वर्षांसाठी नवीन डिझेल बस वापरास परवानगी देऊ नये, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.