मुंबई: जेएसडब्ल्यू समूहातील कंपनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सोमवारी तिच्याद्वारे संचालित महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जयगड आणि धरमतर या बंदरांच्या क्षमता विस्तारासाठी २,३५९ कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला सोमवारी मान्यता दिली.

सध्याची १७० दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष माल हाताळणी क्षमता आर्थिक वर्ष २०३० पर्यंत प्रति वर्ष ४०० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याच्या कंपनीच्या योजनेचा एक भाग म्हणून हा क्षमता विस्तार हाती घेण्यात आला आहे. प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीतून प्रति वर्ष ३६ दशलक्ष टनांची क्षमतेत भर पडणे अपेक्षित असून, जयगड बंदराच्या क्षमतेत १५ दशलक्ष टनांची, तर धरमतर बंदराच्या क्षमतेत वार्षिक २१ दशलक्ष टनांनी वाढ होईल, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
centre to announce new national cooperative policy drafted by panel of 47 member
नवीन राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच; पुढील दोन-तीन महिन्यांत घोषणा अपेक्षित
adani power project godda
Adani Group: अदाणी समूहाचा बांगलादेशला इशारा; “गोड्डा वीज प्रकल्पाची ५० कोटी डॉलर्सची थकबाकी…”!
electric mobility promotion scheme 2024 to be extended says hd kumaraswamy
अवजड उद्योगमंत्र्यांचा मात्र ई-वाहनांना प्रोत्साहन कायम राहण्याचा दावा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Nirmala Sitharaman GST Council Meeting
GST Council Meeting : कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार, फरसाणावरील जीएसटीत घट; केंद्र सरकारचे मोठे निर्णय
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

हेही वाचा >>> Adani Group: अदाणी समूहाचा बांगलादेशला इशारा; “गोड्डा वीज प्रकल्पाची ५० कोटी डॉलर्सची थकबाकी…”!

विस्तार योजनेत नवीन धक्क्यांसाठी यांत्रिक, नागरी आणि इलेक्ट्रिकल कामांचा समावेश आहे आणि तृतीय-पक्षाच्या मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जयगड बंदरासाठी रेल्वे साइडिंगसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या विकसनाचाही यात समावेश आहे. कंपनीने निवेदनांत दिलेल्या माहितीनुसार, विस्तारापश्चात जयगड बंदराची एकूण क्षमता सध्याच्या वार्षिक ५५ दशलक्ष मेट्रिक टनांवरून, ७० दशलक्ष टनांवर जाईल आणि धरमतर बंदराची क्षमता सध्याच्या वार्षिक ३४ दशलक्ष मेट्रिक टनांवरून, ५५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढेल. या विस्तार योजनेचे उद्दिष्ट प्रामुख्याने डोलवी, महाराष्ट्र येथे प्रस्तावित ५० लाख मेट्रिक टन क्षमतेच्या पोलाद निर्मिती सुविधेतून वाढलेल्या मालवाहतुकीच्या गरजांची पूर्तता केली जाईल. दोन्ही बंदरांच्या विस्तारामुळे अंदाजे वार्षिक २७ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत अतिरिक्त माल हाताळणी क्षमता निर्माण होऊ शकेल. दोन्ही बंदरांबाबत प्रस्तावित विस्तार योजनेतील बांधकाम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.