मुंबई: जेएसडब्ल्यू समूहातील कंपनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सोमवारी तिच्याद्वारे संचालित महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जयगड आणि धरमतर या बंदरांच्या क्षमता विस्तारासाठी २,३५९ कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला सोमवारी मान्यता दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याची १७० दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष माल हाताळणी क्षमता आर्थिक वर्ष २०३० पर्यंत प्रति वर्ष ४०० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याच्या कंपनीच्या योजनेचा एक भाग म्हणून हा क्षमता विस्तार हाती घेण्यात आला आहे. प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीतून प्रति वर्ष ३६ दशलक्ष टनांची क्षमतेत भर पडणे अपेक्षित असून, जयगड बंदराच्या क्षमतेत १५ दशलक्ष टनांची, तर धरमतर बंदराच्या क्षमतेत वार्षिक २१ दशलक्ष टनांनी वाढ होईल, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> Adani Group: अदाणी समूहाचा बांगलादेशला इशारा; “गोड्डा वीज प्रकल्पाची ५० कोटी डॉलर्सची थकबाकी…”!

विस्तार योजनेत नवीन धक्क्यांसाठी यांत्रिक, नागरी आणि इलेक्ट्रिकल कामांचा समावेश आहे आणि तृतीय-पक्षाच्या मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जयगड बंदरासाठी रेल्वे साइडिंगसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या विकसनाचाही यात समावेश आहे. कंपनीने निवेदनांत दिलेल्या माहितीनुसार, विस्तारापश्चात जयगड बंदराची एकूण क्षमता सध्याच्या वार्षिक ५५ दशलक्ष मेट्रिक टनांवरून, ७० दशलक्ष टनांवर जाईल आणि धरमतर बंदराची क्षमता सध्याच्या वार्षिक ३४ दशलक्ष मेट्रिक टनांवरून, ५५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढेल. या विस्तार योजनेचे उद्दिष्ट प्रामुख्याने डोलवी, महाराष्ट्र येथे प्रस्तावित ५० लाख मेट्रिक टन क्षमतेच्या पोलाद निर्मिती सुविधेतून वाढलेल्या मालवाहतुकीच्या गरजांची पूर्तता केली जाईल. दोन्ही बंदरांच्या विस्तारामुळे अंदाजे वार्षिक २७ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत अतिरिक्त माल हाताळणी क्षमता निर्माण होऊ शकेल. दोन्ही बंदरांबाबत प्रस्तावित विस्तार योजनेतील बांधकाम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

सध्याची १७० दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष माल हाताळणी क्षमता आर्थिक वर्ष २०३० पर्यंत प्रति वर्ष ४०० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याच्या कंपनीच्या योजनेचा एक भाग म्हणून हा क्षमता विस्तार हाती घेण्यात आला आहे. प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीतून प्रति वर्ष ३६ दशलक्ष टनांची क्षमतेत भर पडणे अपेक्षित असून, जयगड बंदराच्या क्षमतेत १५ दशलक्ष टनांची, तर धरमतर बंदराच्या क्षमतेत वार्षिक २१ दशलक्ष टनांनी वाढ होईल, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> Adani Group: अदाणी समूहाचा बांगलादेशला इशारा; “गोड्डा वीज प्रकल्पाची ५० कोटी डॉलर्सची थकबाकी…”!

विस्तार योजनेत नवीन धक्क्यांसाठी यांत्रिक, नागरी आणि इलेक्ट्रिकल कामांचा समावेश आहे आणि तृतीय-पक्षाच्या मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जयगड बंदरासाठी रेल्वे साइडिंगसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या विकसनाचाही यात समावेश आहे. कंपनीने निवेदनांत दिलेल्या माहितीनुसार, विस्तारापश्चात जयगड बंदराची एकूण क्षमता सध्याच्या वार्षिक ५५ दशलक्ष मेट्रिक टनांवरून, ७० दशलक्ष टनांवर जाईल आणि धरमतर बंदराची क्षमता सध्याच्या वार्षिक ३४ दशलक्ष मेट्रिक टनांवरून, ५५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढेल. या विस्तार योजनेचे उद्दिष्ट प्रामुख्याने डोलवी, महाराष्ट्र येथे प्रस्तावित ५० लाख मेट्रिक टन क्षमतेच्या पोलाद निर्मिती सुविधेतून वाढलेल्या मालवाहतुकीच्या गरजांची पूर्तता केली जाईल. दोन्ही बंदरांच्या विस्तारामुळे अंदाजे वार्षिक २७ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत अतिरिक्त माल हाताळणी क्षमता निर्माण होऊ शकेल. दोन्ही बंदरांबाबत प्रस्तावित विस्तार योजनेतील बांधकाम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.