केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देशातील विविध शहारांमध्ये जाऊन अर्थसंकल्पाबाबत माहिती देत आहेत. अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानंतर अदाणी समूहावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. शेअर मार्केटमध्ये काही काळ यामुळे पडझड पाहायला मिळाली. भांडवलदारांनी एलआयसी आणि एसबीआय सारख्या सरकारी संस्थाचे बुडवलेले कर्जा याबाबतही उलटसुलट चर्चा झाली. त्यानंतर अर्थमंत्री यांनी सोमवारी एक मोठे विधान केले आहे. बिझनेस टुडे या संकेतस्थळाशी बोलत असताना त्यांनी सांगितले, “एलआयसी आणि एसबीआयने त्यांचे म्हणणे मांडले आहे. सरकार म्हणून आम्ही त्यांना प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन करु शकत नाही की त्यांनी गुंतवणुकीसाठी कोणत्या कंपनीला निवडावे किंवा निवडू नये. ते त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा