नवी दिल्ली : देशात आर्थिक समावेशनाला चालना देण्यात मायक्रोफायनान्स अर्थात सूक्ष्मवित्त संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, मात्र त्यांना अवाजवी आणि क्षमतेपेक्षा अधिक कर्ज देण्यापासून परावृत्त केले पाहिजे, असे मत केंद्रीय वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी बुधवारी य़ेथे व्यक्त केले.

बचत गटांना किंवा संयुक्त दायित्व गटांना कर्ज देताना त्यांची क्षमता आणि क्षेत्रातील मानदंडानुसार कर्ज देणे आवश्यक आहे. अन्यथा परतफेड करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या बाबी सूक्ष्मवित्त क्षेत्रासाठीच नुकसानकारक ठरतील. यामुळे आपण किती कर्ज देतो, कधी कर्ज देतो आणि कसे कर्ज देतो याविषयी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.

profit of kpit technologies in automotive sector
 ‘केपीआयटी’ला २०३ कोटींचा तिमाही नफा
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई
narendra modi justin trudeau lawrence bishnoi 1
बिश्नोई टोळीमुळे भारत-कॅनडा वाद चिघळला, परराष्ट्र मंत्रालयाचे ट्रुडो सरकारवर मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?
Lawrence Bishnoi
Lawrence Bishnoi : ‘लॉरेन्स बिश्नोईच्या कुटुंबाकडे शेकडो एकर जमीन, त्याच्यावर वर्षाला करतात ३५ लाखांचा खर्च’, लॉरेन्सच्या भावाने दिली धक्कादायक माहिती
Ajit Pawar Party MLA Mocks MVA on Total of 85+85+85
Amol Mitkari : “महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ८५+८५+८५ म्हणजे २७० वाह..”, अजित पवारांच्या पक्षाने उडवली खिल्ली
Ladki Bahin Yojana Suspend
Ladki Bahin Yojana : निवडणूक आयोगाचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारला महत्त्वाचे निर्देश!

हेही वाचा >>> Gold Silver Rate : सोनं ७८ हजारांच्या पार! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या चांदीचा दर

बचत गट किंवा संयुक्त दायित्व गटांमध्ये आर्थिक साक्षरता मर्यादित आहे. शिवाय त्यांचा बाह्य जगाशी संपर्क मर्यादित आहे. त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी त्यांना आवश्यक तेवढा वित्तपुरवठा करून त्यांच्या भरभराटीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही नागराजू म्हणाले.

वेगवेगळ्या योजनेअंतर्गत, देशातील ७७ लाखांहून अधिक महिला बचत गटांना २.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून त्याचा १० कोटी गरीब कुटुंबांना लाभ मिळाला आहे. याबरोबरच संयुक्त दायित्व गटांना ४.४ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले असून त्याचा सुमारे ८ कोटी गरजवंत कुटुंबांना फायदा झाला आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकार लखपती दीदी योजनादेखील राबवत आहे, ते म्हणाले, या योजनेचा उद्देश बचत गटातील महिला सदस्यांमधून उद्योजक घडवण्याचा आहे. शिवाय त्यांच्या उद्योगाचा विस्तार करून व्यवसाय स्थापित करण्यास आणि वाढविण्यास सक्षम करण्याचा योजनेचा मानस आहे.