नवी दिल्ली : देशात आर्थिक समावेशनाला चालना देण्यात मायक्रोफायनान्स अर्थात सूक्ष्मवित्त संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, मात्र त्यांना अवाजवी आणि क्षमतेपेक्षा अधिक कर्ज देण्यापासून परावृत्त केले पाहिजे, असे मत केंद्रीय वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी बुधवारी य़ेथे व्यक्त केले.

बचत गटांना किंवा संयुक्त दायित्व गटांना कर्ज देताना त्यांची क्षमता आणि क्षेत्रातील मानदंडानुसार कर्ज देणे आवश्यक आहे. अन्यथा परतफेड करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या बाबी सूक्ष्मवित्त क्षेत्रासाठीच नुकसानकारक ठरतील. यामुळे आपण किती कर्ज देतो, कधी कर्ज देतो आणि कसे कर्ज देतो याविषयी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.

Non-vegetarian food in Samruddhi Mini Saras exhibition being held under Umed Mission
खेकडा कढी, बटेर हंडी… शासनाच्या प्रदर्शनात चक्क मांसाहाराचा ‘सरस’ तडका…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Budget 2025 IIT IIM MBBS seats
Budget 2025 : IIT च्या ६,५०० व वैद्यकीय महाविद्यालयांतील ७५,००० जागा वाढवणार! अर्थमंत्र्यांची घोषणा
Applicants disapproval due to prices for CIDCO preferred houses navi Mumbai news
२६ हजार घरे, १५ हजार अर्जदार; ‘सिडको’च्या पसंतीच्या घरांसाठी दरांमुळे नापसंती
Information from Minister Atul Save regarding the distribution of scholarships by the Social Welfare Department Pune news
समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्तींचे लवकरच वितरण; मंत्री अतुल सावे यांची माहिती
TReDS, features , uses , TReDS news,
Money Mantra : TReDSची उपयुक्तता आणि वैशिष्ट्यं काय?
e-insurance account , insurance ,
Money Mantra : ई – इन्शुरन्स अकाऊंट काढणं का महत्त्वाचं आणि त्याचा उपयोग कसा होतो?
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात, १५०० की २१०० आले? महिलांनो ‘असा’ चेक करा बँक बॅलन्स!

हेही वाचा >>> Gold Silver Rate : सोनं ७८ हजारांच्या पार! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या चांदीचा दर

बचत गट किंवा संयुक्त दायित्व गटांमध्ये आर्थिक साक्षरता मर्यादित आहे. शिवाय त्यांचा बाह्य जगाशी संपर्क मर्यादित आहे. त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी त्यांना आवश्यक तेवढा वित्तपुरवठा करून त्यांच्या भरभराटीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही नागराजू म्हणाले.

वेगवेगळ्या योजनेअंतर्गत, देशातील ७७ लाखांहून अधिक महिला बचत गटांना २.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून त्याचा १० कोटी गरीब कुटुंबांना लाभ मिळाला आहे. याबरोबरच संयुक्त दायित्व गटांना ४.४ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले असून त्याचा सुमारे ८ कोटी गरजवंत कुटुंबांना फायदा झाला आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकार लखपती दीदी योजनादेखील राबवत आहे, ते म्हणाले, या योजनेचा उद्देश बचत गटातील महिला सदस्यांमधून उद्योजक घडवण्याचा आहे. शिवाय त्यांच्या उद्योगाचा विस्तार करून व्यवसाय स्थापित करण्यास आणि वाढविण्यास सक्षम करण्याचा योजनेचा मानस आहे.

Story img Loader