भारताची चांद्रयान ३ मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली आणि इस्रोच्या लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला भारत हा जगातील पहिला देश आहे. त्यामुळेच हे मिशन अनेक अर्थांनी विशेष ठरते. चांद्रयान ३ च्या या यशाचे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साक्षीदार बनलेत आणि त्यांनी भारतात लोकप्रिय असलेले ‘चंदा मामा दूर के’ नव्हे तर ‘चंदा मामा एक टूर के’ म्हणत येत्या काही दिवसांत इस्रो ही जगातील सर्वात मोठी संस्था बनणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच अंतराळाच्या अर्थव्यवस्थेतही इस्रो आता नासाशी स्पर्धा करणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, इस्रोचा हा प्रवास एकेकाळी फक्त सायकलवरून सुरू झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या भविष्यातील योजनांचाही खुलासा केला आहे, ज्यामुळे भारताने जगातील अंतराळ अर्थव्यवस्थेत वेगळे स्थान पटकावले आहे. यामध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल १’ मोहीम, मानवाला अंतराळात पाठवण्याची ‘गगनयान’ मोहीम आणि शुक्र ग्रहाला भेट देण्याच्या मोहिमेचा समावेश आहे. याआधी भारताने मंगळावर ऑर्बिटर मिशन पाठवले आहे, जे जगातील अशा प्रकारचे पहिले अंतराळ अभियान होते, जे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले होते.

चांद्रयान ३ ने इस्रोला नासाच्या पुढे नेले

भारताची चांद्रयान ३ मोहीम इस्रोला नासाच्या पुढे नेणारी आहे. इस्रोने चंद्राच्या त्या भागाला स्पर्श केला आहे, ज्याला स्वतः सूर्य देखील स्पर्श करू शकत नाही. भारताशिवाय अजून कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला नाही. त्यामुळेच आता भारत अवकाश अर्थव्यवस्थेत जगातील मोठ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाला आहे. इतकेच नाही तर अलीकडेच रशियाने १६०० कोटी रुपये खर्चून तयार केलेले ‘लुना २५’ मिशनही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले होते, परंतु ते लँडिंगपूर्वीच कोसळले. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचे भारताचे मिशन आता फक्त ६१५ कोटी रुपये खर्चून पूर्ण झाले आहे.

जगामधील अंतराळ अर्थव्यवस्था बदलणार

इस्रोच्या या यशामुळे जगात अंतराळ अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. सध्या इस्रो जगातील अनेक देशांचे, खासगी कंपन्यांचे उपग्रह कमी खर्चात प्रक्षेपित करण्याचे काम करते. यासाठी इस्रोचे व्यावसायिक युनिट अँट्रिक्स स्वतंत्रपणे काम करते. एलॉन मस्कचे स्टारएक्स आणि जेफ बेझोसचे ब्लू ओरिजिनदेखील या स्पेस इकॉनॉमीमध्ये बाजी मारत आहेत. आता ISRO या सर्व कंपन्यांना टक्कर देण्यास सक्षम आहे, कारण भारत त्यांच्यापेक्षा खूपच कमी खर्चात अंतराळ मोहीम पूर्ण करू शकतो.

हेही वाचाः चांद्रयान ३ मोहिमेत टाटा अन् गोदरेजच्या कंपन्यांनी निभावली महत्त्वाची भूमिका अन् इस्रोनं रचला इतिहास

इस्रोचा प्रवास सायकलवरून सुरू झाला

जेव्हा इस्रोने चंद्र आणि मंगळावर पोहोचायला सुरुवात केली, तेव्हा पहिल्या रॉकेटचे भाग वाहून नेण्यासाठी त्याच्याकडे योग्य वाहनही नव्हते. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) ची स्थापना १९६२ मध्ये झाली. वर्ष १९६९ मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्रोची स्थापना झाली. इंकॉस्पर बनवण्याचे श्रेय हे डॉ. विक्रम साराभाई यांना जाते. स्थापनेच्या पुढच्याच वर्षी इंकॉस्परने अंतराळात जाणारे पहिले रॉकेट प्रक्षेपित केले. वातावरणाची चाचणी घेण्यासाठी डिझाइन केलेले हे दणदणीत रॉकेट केरळमधील थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आले, आज त्याचे नाव विक्रम साराभाई स्पेस सेंटर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचाः चांद्रयान ३ मोहिमेमुळे मोदी सरकारच्या ‘या’ कंपनीने रचला इतिहास, आता जग होणार अवाक्

या रॉकेटचे अनेक भाग सायकलच्या मदतीने लँडिंगच्या ठिकाणी नेण्यात आले. गावकऱ्यांची मदत घेण्यात आली आणि जमिनीवर रॉकेट टाकण्यात आले. यानंतर गोष्टी पुढे सरकल्या आणि ISRO ने १९ एप्रिल १९७५ रोजी पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ प्रक्षेपित केला. तेव्हा इस्रोला तत्कालीन सोव्हिएत युनियन रशियाने मदत केली होती. आज परिस्थिती अशी बदलली आहे की, भारताची चंद्र मोहीम यशस्वी झाली आहे, तर रशियाची चंद्र मोहीम अपयशी ठरली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once isro launched the first rocket on a bicycle now it is ready to compete even with nasa vrd
Show comments