मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने भागधारकांना एकास एक (१:१) या प्रमाणात बक्षीस (बोनस) समभाग देण्याचा विचार करीत आहे. कंपनीकडून संचालक मंडळाला याबाबत शिफारस केली जाणार असून, ५ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.

रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बक्षीस समभागाची घोषणा करताना, कंपनीची भक्कम वित्तीय कामगिरी आणि व्यवसाय विस्तारावर भाष्य केले. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ५ सप्टेंबरला होणार आहे. बैठकीच्या विषयपत्रिकेवर बक्षीस समभाग देण्याचा मुद्दा आहे. कंपनीच्या राखीव गंगाजळीतून या संबंधाने खर्चाची पूर्तता केली जाऊन, भागधारकांना हे इनाम दिले जाणार आहे.

mukesh ambani
अल्पकालीन नफा ‘रिलायन्स’चे लक्ष्य नाही – अंबानी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

हेही वाचा : अल्पकालीन नफा ‘रिलायन्स’चे लक्ष्य नाही – अंबानी

संचालक मंडळाने मंजुरी दिल्यास कंपनीकडून भागधारकांना बक्षीस समभाग देण्याची ही पाचवी वेळ असेल. यापूर्वी सप्टेंबर २०१७ मध्ये कंपनीने १:१ बक्षीस समभाग दिला आहे. शिवाय मागील ४७ वर्षांत कंपनीने चार वेळा हक्कभाग विक्रीतून भागधारकांना लाभ देऊ केला आहे.