पीटीआय, नवी दिल्ली

सर्व ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेव रकमेवर विमा संरक्षण देणे आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असले तरी बँक बुडाल्यास छोटे खातेदार, ज्येष्ठ नागरिकांच्या संपूर्ण ठेवीला पूर्ण विमा संरक्षण देऊन, त्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल काय, या संबंधाने चाचपणी होणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्वर राव यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
state bank of india fd marathi news
बँकांच्या ठेवींमध्ये घट हे सांख्यिकी मिथक! स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचे प्रतिपादन
finance minister Nirmala sitaraman
ठेवी संग्रहणासाठी विशेष मोहिमेची गरज; सरकारी बँकांना अर्थमंत्र्यांची हाक
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Petition in court against Nitin Gadkaris ministry about loss of one lakh crores to the country
नितीन गडकरींच्या मंत्रालयामुळे देशाला एक लाख कोटींचा तोटा? न्यायालयात याचिका… काय आहे कारण?

एका कार्यक्रमात बोलताना एम. राजेश्वर राव म्हणाले की, सर्व ठेवींना पूर्ण विमा संरक्षण मिळणे हे ठेवीदारांसाठी योग्य असून, बँकांनाही जबाबदारी टाळण्यापासून रोखणारे आहे. असे असले तरी त्याचे काही तोटे असून, ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यही नाही. मात्र बँकांच्या ग्राहकांमधील ठराविक ग्राहक वर्गाला विमा संरक्षण देण्याचे पाऊल उचलता येईल. त्यात छोटे ठेवीदार, ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्य देता येईल. छोट्या ठेवीदारांच्या एकत्रित ठेवींना पूर्ण विमा संरक्षण देता येईल, या मुद्द्याचे बारकाईने मूल्यमापन केले गेले पाहिजे. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ डिपॉझिट इन्शुरर्स (आयएडीआय) या ठेव-विमा क्षेत्रात कार्यरत आशिया-प्रशांत क्षेत्रातील प्रादेशिक समितीच्या जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एम. राजेश्वर राव बोलत होते.

हेही वाचा : Gold-Silver Price: रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत बदल, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहक थक्क

ठेवींवरील विमा संरक्षणाबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. २४ तास बँकिंग सेवा आणि समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव यामुळे अतिशय जलदपणे एखाद्या बँकेतून ठेवी काढल्या जातात. याला एखादी चुकीची माहिती कारणीभूत असते. त्यातून ठेवीदार हवालदिल होऊन ठेवी काढण्यासाठी धावाधाव करतात. ठेवींवर संरक्षण असल्याची बाब ग्राहकांपर्यंत पोहोचल्यास ते ठेवी काढून घेणार नाहीत, असे एम. राजेश्वर राव यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Gold-Silver Price: सोन्याच्या दराने बाजारपेठेत उडवली खळबळ, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत वाचून फुटेल घाम

ठेव-विमा संरक्षणाला महत्त्व

एखादी बँक बुडाल्यास ठेवीदाराला रिझर्व्ह बँकेच्या मालकीच्या ठेव विमा आणि पत हमी मंडळाकडून (डीआयसीजीसी) ठेवीवरील विम्याने संरक्षित रकमेची भरपाई मिळते. सध्या मुद्दल आणि त्यावरील व्याज मिळून एकत्रित कमाल पाच लाख रुपयांपर्यंत ठेवी या विम्याने सुरक्षित आहेत. यामुळे बँक बुडाल्याने संकटात येणाऱ्या ठेवीदारांना दिलासा मिळतो आणि बँकिंग व्यवस्थेवरील विश्वासही कायम राहतो. छोटे ठेवीदार आणि ज्येष्ठांबाबत ही कमाल पाच लाखांची मर्यादा न ठेवता, त्यांची संपूर्ण ठेव रक्कम विम्याने सुरक्षित करून, संपूर्ण भरपाई दिली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.