मुंबई : चुकीच्या धोरणांमुळे बँकांपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते, हे पाहता देशाच्या बँकांच्या व्यवसाय प्रारुपावर रिझर्व्ह बँकेचे बारकाईने लक्ष आहे, असा निर्वाळा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी येथे दिला.

एका कार्यक्रमात बोलताना दास म्हणाले की, नजीकच्या काळातील चिंताजनक घडामोडी या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्यानंतर सुरू झाल्या. संपूर्ण व्यवस्थेवर आलेला ताण कमी करण्यासाठी खूपच धावाधाव करावी लागली. सदोष व्यवसाय प्रारुपामुळेच हे संकट निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. काही विकसित अर्थव्यवस्थांमध्ये नजीकच्या काळात वित्तीय अस्थिरतेचे प्रकार दिसून आले. त्याचा भारतीय बँकांवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. भारतीय बँका व्यवस्थितपणे कार्य करीत आहेत.

person from a middle class family built a company worth crores
Success Story : पैसा आणि ओळख नाही… केवळ मेहनतीच्या जोरावर मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीने उभी केली करोडोंची कंपनी
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Reserve Bank Deputy Governor Swaminathan warns Fintech to avoid debt recovery in wrong way
कर्जवसुली चुकीच्या पद्धतीने नको, रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन यांचा ‘फिनटेक’ना इशारा
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
central and state government introduce Unified Pension Scheme to its employee
विश्लेषण : जुन्या पेन्शनवर एकीकृत निवृत्तिवेतन योजनेचा पर्याय किती फायद्याचा?
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
Why did SEBI ban Anil Ambani from trading in the capital market for five years
‘सेबी’ने अनिल अंबानींवर भांडवली बाजारात व्यवहारास पाच वर्षांची बंदी का घातली?

हेही वाचा – ‘इन्कोव्हॅक’ लस आजपासून; मुंबई महापालिकेतर्फे २४ केंद्रांवर नाकाद्वारे लसीकरण

अमेरिकेतील अलीकडच्या या घडामोडी पाहता अडचणीत आलेल्या बँकांची व्यवसाय पद्धती योग्य की अयोग्य असा मुद्दाही उपस्थित झाला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने भारतीय बँकांच्या व्यवसाय प्रारुपाला बारकाईने तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यात जर त्रुटी राहिल्यास त्यातून संकट निर्माण होऊ शकते, असे दास यांनी सांगितले.

अनुत्पादित कर्जांमध्ये घटबँकांच्या एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी होऊन डिसेंबर २०२२ मध्ये ४.४१ टक्क्यांवर आले. ते मार्च २०२२ मध्ये ५.८ टक्के, तर मार्च २०२१ मध्ये ७.३ टक्के होते. भारतीय बँकांकडील भांडवल उपलब्धता डिसेंबर २०२२ अखेर १६.१ टक्के होती. किमान गरजेपेक्षा हे प्रमाण जास्त आहे, असे शक्तिकांत दास यांनी नमूद केले.

हेही वाचा – मुंबई :‘बेस्ट’मध्ये मोबाइलचा मोठा आवाज बंद !स्पीकरवर गप्पा, गाणी ऐकल्यास पोलिसांत तक्रार

बँकेच्या व्यवसाय पद्धतीमुळे तिच्या ताळेबंदातील काही भागांत जोखीम निर्माण होऊ शकते. त्यातूनच पुढे जाऊन मोठे संकट निर्माण होते, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.