नवी दिल्ली : देशातील स्पेक्ट्रम लिलाव दुसऱ्या दिवशी बोली सुरू झाल्यानंतर काही तासांतच आटोपले. दूरसंचार कंपन्यांनी ११ हजार ३०० कोटी रुपयांच्या रेडिओ लहरी खरेदी केल्या असून, सरकारच्या अंदाजित स्पेक्ट्रम मूल्याच्या तुलनेत ही रक्कम केवळ १२ टक्के आहे. सरकारने दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा स्पेक्ट्रम लिलाव केले. एकूण सात फेऱ्यात केवळ १४० ते १५० मेगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रमची विक्री झाल्याचा अंदाज आहे. यासाठी कंपन्यांनी ११ हजार ३४० कोटी रुपयांची बोली लावली.

हेही वाचा >>> आणखी १.७ ते ३.६ गिगावॉट क्षमतेच्या डेटा सेंटरची गरज; देशात डिजिटल स्थित्यंतरामुळे वाढती मागणी

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spectrum auction concludes with bids over rs 11300 cr on day 2 print eco news zws
First published on: 26-06-2024 at 21:42 IST