Success Story Arvind Swamy : अरविंद स्वामी हे दक्षिणेतील अभिनेते आहेत. त्यांनी इंडस्ट्रीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असे. या अभिनेत्याने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची चमक दाखवली. कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी सिनेसृष्टीतील आपली चमकदार कारकीर्द सोडली, परंतु जेव्हा त्यांना पुन्हा अभिनय सुरू करायचा होता, तेव्हा त्यांचा अपघात झाला, त्यानंतर ते चित्रपटसृष्टीपासून दूर गेले. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरविंद स्वामी आज ५३ वर्षांचे झाले आहेत. या अभिनेत्याचा जन्म १८ जून १९७० रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. अभिनेत्याचे प्रारंभिक शिक्षण तिथेच झाले. अरविंदने अमेरिकेत इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. अरविंदने केवळ साऊथच्या चित्रपटांमध्ये अभिनयाचा झेंडा फडकवला नाही, तर त्यांनी ‘रोजा’ आणि ‘बॉम्बे’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले.

अरविंद स्वामी यांना इयत्ता १०वीपासून डॉक्टर व्हायचे होते. कॉलेजमध्ये ते पॉकेटमनीसाठी मॉडेलिंगचे काम करायचे. त्यानंतर मणिरत्नमने त्यांना एका जाहिरातीत पाहिले आणि भेटीसाठी बोलावले. त्यांनी आणि संतोष सिवन यांनी त्यांना चित्रपटाच्या निर्मितीबद्दल माहिती दिली. १९९१ मध्ये मणिरत्नम यांच्या ‘थलापथी’ या चित्रपटातून अरविंदने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. पुढच्या वर्षी १९९२ मध्ये ते ‘रोजा’ चित्रपटात दिसले. मणिरत्नम आणि संतोष सिवन यांनी त्यांना अभिनयाचे सर्व बारकावे त्यांच्या अधिपत्याखाली शिकवले.

हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिसबरोबरच आता तुम्ही बँकेकडून मिळवू शकता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र; योजनेत विशेष काय?

१९९५ मध्ये आलेल्या ‘बॉम्बे’ या चित्रपटाने राज्य आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले होते. या चित्रपटातील अभिनेत्याचा अभिनय चांगलाच गाजला होता. यानंतर त्यांना अनेक चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले. अरविंद सतत यशाच्या शिखरांना स्पर्श करीत होते, पण त्यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्यासाठी अभिनय करिअरमधून ब्रेक घेतला, पण जेव्हा त्यांनी चित्रपटांकडे परतण्याचा विचार केला, तेव्हा त्यांचा एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या अपघातातून सावरायला त्यांना बराच वेळ लागला.

हेही वाचाः सरकारी बँकांच्या प्रमुखांची बैठक घेऊन अर्थमंत्री घेणार बँकांची झाडाझडती

अरविंद यांच्या बॉलीवूड करिअरबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी १९९८ मध्ये ‘सात रंग के सपने’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्याबरोबर जुही चावला होती. मात्र, पडद्यावर हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही. मात्र, अभिनेते अरविंद स्वामीने वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट करून बरीच प्रसिद्धी मिळवली.

अरविंद स्वामींची निव्वळ संपत्ती आणि व्यवसायाचे साम्राज्य

२००० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच ते एक यशस्वी व्यावसायिक होते, त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी आजपर्यंतचा व्यवसायातील त्यांचा सर्वात यशस्वी प्रयत्न सुरू केला. त्यांच्या दुखापतीपूर्वी स्वामींनी टॅलेंट मॅक्सिमस या कंपनीची स्थापना केली, जी भारतात वेतन प्रक्रिया आणि तात्पुरते कर्मचारी नियुक्त करण्याचे काम पाहते. RocketReach यांसारख्या एकाधिक मार्केट ट्रॅकिंग पोर्टलनुसार, २०२२ मध्ये टॅलेंट मॅक्सिमसची कमाई तब्बल ४१८ दशलक्ष डॉलर (३३०० कोटी रुपये) होती. स्वामी यांचा कंपनीच्या कामकाजात सहभाग असतो.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story arvind swamy gave up his dream of becoming a doctor and became an actor managing a business worth 3300 crores today vrd