नवी दिल्ली : देशांतर्गत पातळीवर दूरसंचार उद्योगातील दर जगातील इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी पातळीवर असल्याचे भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गोपाल विट्टल यांनी बुधवारी सांगितले. दूरसंचार कंपन्यांकडून होणाऱ्या गुंतवणुकीवर परतावा गुणोत्तर सुधारण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>‘बचतदार ते गुंतवणूकदार गतिमान संक्रमण स्वागतार्हच’; अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून १० वर्षातील प्रगतीचे गुण गाण

DSP Mutual Fund
पुढील दशक उत्पादन क्षेत्राचे, डीएसपी म्युच्युअल फंडाचा आशावाद
Reliance Industries market capitalization at 21 lakh crores
‘सेन्सेक्स’ ७९ हजारांच्या पातळीवर कायम; रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल २१ लाख कोटींवर
Maharashtra state leading in foreign investment Mumbai
विदेशी गुंतवणुकीत राज्य आघाडीवर; ‘मैत्री’ कक्षाकडे उद्याोजकांच्या तक्रारींचा ओघ वाढला
Sell Tur Buy TCS share, prediction of good returns in tcs, may decrease in tur price, Strategic Investment, Strategic Investment in Sell Tur Buy TCS share, tcs promising returns, share market, commodity market, decrease in tur price, finance article, marathi finance article, tcs share,
क…कमॉडिटीचा : तूर विका, टीसीएस घ्या
Decisions on petrol-diesel up to states Finance Minister appeal regarding bringing under GST
पेट्रोल-डिझेलबाबत निर्णय राज्यांच्या हाथी; जीएसटी कक्षेत आणण्याबाबत अर्थमंत्र्यांचे आवाहन
License for Ola and Uber in pune, State Appellate Tribunal give next day 8 July, ola uber ac taxi, ola uber in pune, marathi news,
पुण्यात ओला, उबरचे काय होणार? जाणून घ्या कधी होणार अंतिम निर्णय…
Chakan Industrial Estate has been experiencing frequent power outages for some time
‘बत्ती गुल’मुळे उद्योग संकटात! विजेच्या लपंडावाचा चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना ‘शॉक’
Mumbai, security guards,
चौपाट्यांवर तैनात सुरक्षा रक्षक मूलभूत सुविधांपासून वंचित, सुविधा उपलब्ध करण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

सध्या देशात तीन मुख्य कंपन्या ग्राहकांना दूरसंचार सेवा पुरवत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा अतिशय तीव्र आहे. गेल्या महिन्यात आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या व्होडाफोन आयडियाने भांडवल उभारणी केली. ही आनंददायी बाब आहे. कारण प्रतिस्पर्धी कंपनी असली तरी दूरसंचार क्षेत्रात अधिकाधिक कंपन्यांनी टिकून राहणे आवश्यक आहे. ५जी सेवांचे दालन खुले झाल्याने कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली असून अधिक भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता आहे. परिणामी एकीकडे खर्च वाढता असून त्या तुलनेत मात्र दूरसंचार दर खूपच कमी आहेत. यामुळे कंपन्यांच्या परताव्यात वाढ होणे आवश्यक असल्याचे विट्टल म्हणाले. भारती एअरटेलचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (आरपू) वर्षभरापूर्वीच्या १९३ रुपयांवरून आठ टक्क्यांनी वाढून २०९ रुपये रुपयांवर पोहोचला आहे. मुख्यतः नायजेरियन चलन नायराच्या अवमूल्यनामुळे एअरटेलच्या मार्च तिमाहीतील एकत्रित नफ्यात ३१ टक्क्यांनी घसरण झाली असून तो २,०७२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर सरलेल्या मार्च तिमाहीत एकत्रित महसूल ४.४ टक्क्यांनी वाढून ३७,५९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ३६,००९ कोटी रुपये राहिला होता.