नवी दिल्ली : देशांतर्गत पातळीवर दूरसंचार उद्योगातील दर जगातील इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी पातळीवर असल्याचे भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गोपाल विट्टल यांनी बुधवारी सांगितले. दूरसंचार कंपन्यांकडून होणाऱ्या गुंतवणुकीवर परतावा गुणोत्तर सुधारण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>‘बचतदार ते गुंतवणूकदार गतिमान संक्रमण स्वागतार्हच’; अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून १० वर्षातील प्रगतीचे गुण गाण

सध्या देशात तीन मुख्य कंपन्या ग्राहकांना दूरसंचार सेवा पुरवत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा अतिशय तीव्र आहे. गेल्या महिन्यात आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या व्होडाफोन आयडियाने भांडवल उभारणी केली. ही आनंददायी बाब आहे. कारण प्रतिस्पर्धी कंपनी असली तरी दूरसंचार क्षेत्रात अधिकाधिक कंपन्यांनी टिकून राहणे आवश्यक आहे. ५जी सेवांचे दालन खुले झाल्याने कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली असून अधिक भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता आहे. परिणामी एकीकडे खर्च वाढता असून त्या तुलनेत मात्र दूरसंचार दर खूपच कमी आहेत. यामुळे कंपन्यांच्या परताव्यात वाढ होणे आवश्यक असल्याचे विट्टल म्हणाले. भारती एअरटेलचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (आरपू) वर्षभरापूर्वीच्या १९३ रुपयांवरून आठ टक्क्यांनी वाढून २०९ रुपये रुपयांवर पोहोचला आहे. मुख्यतः नायजेरियन चलन नायराच्या अवमूल्यनामुळे एअरटेलच्या मार्च तिमाहीतील एकत्रित नफ्यात ३१ टक्क्यांनी घसरण झाली असून तो २,०७२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर सरलेल्या मार्च तिमाहीत एकत्रित महसूल ४.४ टक्क्यांनी वाढून ३७,५९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ३६,००९ कोटी रुपये राहिला होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telecom tariffs in india lower than the world airtel ceo gopal vittal print eco news zws