वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशातील बेरोजगारी वाढीचा दर एप्रिलमध्ये चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ताज्या आकडेवारीने स्पष्ट केले. आशियातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारतात वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेणाऱ्या नोकऱ्या तयार होत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

dengue malaria
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Factory activity at three-month low Production PMI Index at 57.5 points in August
कारखानदारीचा वेग तीन महिन्यांच्या नीचांकाला, निर्मिती ‘पीएमआय निर्देशांक’ ऑगस्टमध्ये ५७.५ गुणांवर
Paytm share price
Paytm Share Price: पेटीएमच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ; पंतप्रधान मोदींनी क्युआर कोडची स्तुती केल्याबद्दल मानले आभार
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
Gold import decline due to CAD
सोने आयातीत घट; चार महिन्यांत ४.२३ टक्क्यांनी घसरून १२.६४ अब्ज डॉलरवर
Kalyan, Dombivli, online investment fraud, Information Technology Act, Manpada police, fraud news, latest news, stock market fraud,
डोंबिवली, कल्याणमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीतून सव्वा कोटीची फसवणूक
Goods exports down 1 2 percent in July
वस्तू निर्यातीत जुलैमध्ये १.२ टक्क्यांची घट; व्यापार तुटीत २३.५ अब्ज डॉलरपर्यंत विस्तार

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर एप्रिल महिन्यात ८.११ टक्के असा चार महिन्यांतील उच्चांकपदाला पोहोचला आहे. मागील वर्षातील डिसेंबरनंतरचा हा उच्चांकी बेरोजगारीचा दर आहे. याआधी मार्च महिन्यात तो ७.८ टक्के होता.

शहरी बेरोजगारीचा दर मार्चमध्ये ८.५१ टक्के होता, तो एप्रिलमध्ये वाढून ९.८१ टक्क्यांवर पोहोचला. याचवेळी ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या दरात थोडी घसरण झाली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर मार्चमध्ये ७.४७ टक्के होता, तो एप्रिलमध्ये ७.३४ टक्क्यांवर आला आहे.
‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार, देशातील रोजगार निर्मितीमध्ये एप्रिल महिन्यात २.५५ कोटींची वाढ होऊन ती एकंदर ४६.७६ कोटींवर पोहोचली आहे. सक्रिय रोजगाराचा दर ४१.९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही तीन वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. विस्तारलेल्या श्रमशक्तीपैकी ८७ टक्के जणांना रोजगार मिळविता आला आहे. एप्रिलमध्ये अतिरिक्त २.२१ कोटी रोजगारांची निर्मिती झाली आहे. रोजगाराचा दर एप्रिलमध्ये ३८.७५ टक्क्यांवर पोहोचला असून, ही मार्च २०२० नंतरची उच्चांकी पातळी आहे. ग्रामीण भागात नव्याने आलेल्या ९४.६ टक्के जणांना रोजगार मिळविता आला, तर शहरी भागात हे प्रमाण ५४.८ टक्के आहे. रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त असल्याचे ‘सीएमआयई’च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

मोदी सरकारसमोर आव्हान

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश नुकताच बनला. देशाच्या लोकसंख्येतील तरुणाईचे प्रमाणही जगाच्या तुलनेत उच्च आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आता वाढत्या श्रमशक्तीला साजेसा रोजगार देण्याचे मोठे आव्हान आहे. पुढील वर्षी उन्हाळ्यात सार्वत्रिक निवडणुका होणे अपेक्षित आहे. त्यावेळी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याच्या मोदी सरकारच्या मनसुब्यांना उधळून लावणारा बेरोजगारी हा सर्वांत मोठा मुद्दा बनू शकेल.