सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत पुनर्विचार करण्यासाठी केंद्रीय अर्थ सचिवांच्या नेतृत्वाखालील समितीकडून अद्याप अंतिम अहवाल सादर करण्यात आलेला नाही. सर्व संलग्न घटकांशी समितीच्या सल्लामसलतीची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी दिली.

बिगरभाजप पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांकडून जुन्या निवृत्ती वेतन योजनेला पसंती दिली जात आहे. याचबरोबर अनेक राज्यांतील कर्मचारी संघटनांकडूनही हीच मागणी उचलून धरली जात आहे. राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करीत असल्याचे या आधीच केंद्र सरकारला कळविले आहे. या पेचावर मध्यममार्ग म्हणून ही समिती कोणत्या तोडग्याची शिफारस करते याबद्दल उत्सुकता आहे.

funding madarsas
मदरशांना निधी देणे थांबवावे, बाल आयोगाची इच्छा; कारण काय? केरळची व्यवस्था इतर राज्यांपेक्षा वेगळी कशी?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Maharashtra State Government opinion in High Court regarding appointment of MLA print politics news
स्थगिती नसल्यानेच आमदारांच्या नियुक्त्या; राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका
the cabinet is angry at the behavior of the officials Mumbai
तुकडेबंदी कायद्याचा भंग करून झालेले जमीन व्यवहार नियमित, राज्य सरकारचा निर्णय
maharashtra government forced barti sarathi mahajyoti to adopt uniform guidelines
विश्लेषण : स्वायत्त संस्थांसाठी ‘समान धोरणा’चा स्पर्धा परीक्षार्थींना फटका कसा?
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
nana Patole devendra fadnavis (1)
Nana Patole : “… तर विरोधकही त्या एन्काऊंटरचं समर्थन करतील”, नाना पटोलेंचं राज्य सरकारला थेट आव्हान!
भविष्यात कोणतेही बदल नाही; सुधारित निवृत्तिवेतन योजनेबाबत राज्य शासनाची स्पष्ट भूमिका
भविष्यात कोणतेही बदल नाही; सुधारित निवृत्तिवेतन योजनेबाबत राज्य शासनाची स्पष्ट भूमिका

हेही वाचाः थरमॅक्सने गुजरातमध्ये उभारला पवन-सौर संमिश्र ऊर्जा प्रकल्प; ‘एवढी’ मेगावॉट वीजनिर्मिती होणार

समितीची सर्व घटकांशी चर्चा सुरू असून, अद्याप कोणताही निष्कर्ष समितीने काढलेला नाही, असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात या समितीबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्या नेतृत्वाखाली एप्रिलमध्ये निवृत्ती वेतन पुनर्विचार समिती नेमण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा पुनर्विचार करणे आणि त्यात बदल सुचविण्याची जबाबदारी समितीवर आहे. याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीची (एनपीएस) नियमावली आणि चौकट यानुसार समिती हे बदल सुचवू शकते.

हेही वाचाः तामिळनाडूतील तांबे शुद्धीकरण प्रकल्पाच्या विक्रीचा ‘वेदान्ता’चा मानस