परदेशातून लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. आता लोक परदेशातून लॅपटॉप आणि टॅबलेट कोणत्याही परवानगीशिवाय आणू शकतात. ग्राहक सचिव सुनील बर्थवाल यांनी ही माहिती दिली आहे. भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही, असंही त्यांनी सांगितले. ऑगस्ट २०२३ मध्ये भारत सरकारने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

मात्र, हार्डवेअर उद्योगाने लॅपटॉप आणि टॅबलेट आयात बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारने आपला निर्णय मागे घेतला आहे. आता सरकार फक्त त्यांच्या मालावर लक्ष ठेवणार आहे.

bjp-flag-759
कर्नाटक सरकार ‘व्यावसायिक चोर’; सीबीआयची परवानगी काढून घेतल्याबद्दल भाजपची टीका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Nitish Kumar government
बिहारमध्ये ११४ वर्षांनंतर भूमी सर्वेक्षण; नितीश कुमार सरकारच्या निर्णयावर विरोधकांची टीका कशासाठी?
mcoca action against NK gang leader and accomplices in Yerwada
येरवड्यातील एन.के. गँगच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?
Mokka action against the leader and accomplices of Enjoy Group in Gherpade Peth Pune news
घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
Vinesh Phogat
Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने…”, विनेश फोगटचा गंभीर आरोप
CM bhagwant mann AAP Punjab
Punjab AAP: मोफत देण्याच्या घोषणा ‘आप’च्या अंगलट; पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावरही कर

हेही वाचाः देशांतर्गत रिफायनरींमध्ये तणाव वाढला! ११ महिन्यांत पामतेलाची आयात २९ टक्क्यांनी वाढून ९०.८० लाख टन

दरवर्षी एवढ्या किमतीचे लॅपटॉप आयात केले जातात

सरकारच्या ऑगस्ट महिन्याच्या आदेशानंतर आयटी हार्डवेअर उद्योगाने चिंता व्यक्त करून सरकारला हा आदेश मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सरकारने आयात बंदीची मुदत आधी वाढवली होती आणि आता ती मागे घेतली आहे. एका अंदाजानुसार, भारत दरवर्षी सुमारे ७-८ अब्ज डॉलर्सच्या संगणक हार्डवेअरशी संबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करतो.

हेही वाचाः It Sector Layoffs : टीसीएस ते इन्फोसिसपर्यंत आयटी कंपन्यांनी आतापर्यंत १६,१६२ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण कारण काय?

भारतातील लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर कोणतीही बंदी असणार नाही, असे सुनील बर्थवाल यांनी व्यापार डेटा जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही फक्त लॅपटॉपच्या आयातीवर बारीक नजर ठेवू, जेणेकरून आम्हाला आयातीवर लक्ष ठेवता येईल. १ नोव्हेंबरपासून आयात व्यवस्थापन प्रणाली लागू होणार आहे. यासंदर्भात काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते काम ३० ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.