अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान ठेवण्यासाठी कोणती गोष्ट केली पाहिजे? कोणते उपाय योजले पाहिजेत? असा प्रश्न विचारल्यास अर्थतज्ज्ञ जी संभाव्य उत्तरे देतील त्यातील पहिले उत्तर म्हणजे, नागरिकांच्या हातामध्ये प्रत्यक्ष खर्च करण्यासाठी पैसा पोहोचला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक महत्त्व आहे ते म्हणजे सणांना. अर्थविषयक लेखामध्ये सणासुदीचे विवेचन कशासाठी? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकेल पण सुगीचे दिवस हा भारतासाठी अर्थव्यवस्था तारून नेणारा घटक ठरू शकतो. दोन महिन्यांपूर्वी भारतात मान्सूनची अवस्था समाधानकारक नव्हती त्यावेळच्या ‘बाजाररंग’मध्ये या धोक्याविषयी लिहिले होते. पण सुदैवाने तो धोका पूर्णतः नसला तरी बहुतेक टळलेला दिसतो. ऑक्टोबर महिन्यात भारतातील आघाडीच्या कंपन्यांचे सप्टेंबरअखेर तिमाहीचे निकाल जाहीर झाले आणि बाजाराला अपेक्षित असा संदेश त्यातून मिळाला आहे. हा संदेश म्हणजे अर्थव्यवस्थेत सुगीचे दिवस नक्की परत येतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा