उद्योगपतींची आत्मचरित्रे वाचायला सुरुवात केली की, अर्थकारण, राजकारण, समाजकारण या सर्व गोष्टींचे एवढे प्रचंड संदर्भ सापडतात की, माणूस आश्चर्यचकितच होतो. शंतनुराव किर्लोस्कर यांचे चरित्र अनेक संघर्षाच्या प्रसंगांनी आकाराला आलेले आहे. काटे आणि फुले या आत्मचरित्राअगोदर अनेक वर्षांपूर्वी जेट युगातला मराठी माणूस हे शंतनुराव किर्लोस्करांनी लिहिलेले पुस्तक वाचलेले होते. रोखठोक बोलणारे, यंत्रांना बोलके करणारे शेती आणि शेतकरी, शेतीसाठी लागणारी हत्यारे, उपकरणे घडवणारे, ती कशी तयार करता येतील याचा सतत विचार करणारे शंतनुराव हे एक वेगळेच रसायन होते. एक मराठी उद्योजक अनेक संकटावर मात करतो, भविष्याची काळजी करू नका, भविष्य निर्माण करा असे सांगतो. बाजाराच्या संबंधाने विचार करायचा तर कमिन्सच्या शेअर विक्रीने १९६२ मध्ये २०० पट जास्त भरणा होणारी मागणी मिळवली होती. हे आज वाचताना आश्चर्याचा धक्का बसतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा