मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षाच्या वतीने सादर झालेल्या या पूर्ण वर्षाच्या अर्थसंकल्पात कोणत्याच गटासाठी कोणतीच विशेष तरतूद नसणे हीच विशेष बाब होती असे नाईलाजाने म्हणावे लागेल. विद्यमान सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात भारताच्या स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात भारताला विकसित देश बनवण्याच्या दिशेने आश्वासक प्रयत्न करणारे धोरण आखणे हा सरकारचा प्रयत्न असेल असे म्हटले गेले होते, याचीच पुढची आवृत्ती म्हणता येईल असा अर्थसंकल्प गेल्या आठवड्यात सादर झाला. अर्थसंकल्प म्हणजे गुंतवणूकदार (देशांतर्गत, किरकोळ, परदेशी सगळेच आले), मध्यमवर्गीय, उद्योजक अशा सर्वांसाठी काही तरी नवी घोषणा घेऊन येईल अशा आत्तापर्यंत चर्चा असायच्या आणि घोषणाही तशाच व्हायच्या. गेल्या दोन अर्थसंकल्पात ही परंपरा बदलून कोणतीही ठळक बातमी येणार नाही पण योजनांची आकडेवारी मात्र सादर केली जाईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडलेला दिसतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा