गेल्या आठवड्या अखेर कृषिमाल कमॉडिटी बाजारात जोरदार हालचाल अनुभवायला मिळाली. सरकारी धोरणांमधील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे आधीच चर्चेत राहिलेल्या आणि टीकेला पात्र झालेल्या कृषिबाजारात परत एकदा तसाच अनुभव आला आहे. सुमारे वर्षभराहून अधिक काळ तांदूळ आणि इतर अन्नधान्यांच्या निर्यातीवर बंदी टाकल्यामुळे मेटाकुटीला आलेल्या व्यापाऱ्यांकडून निदान तांदूळ निर्यातीवरील बंदी तात्काळ काढून टाकण्याची मागणी होत आहे. केंद्राकडे १०० लाख टनापेक्षा अधिक अतिरिक्त तांदूळ असल्यामुळे १ ऑक्टोबरपासून नवीन हंगामातील खरेदी करण्यात येणाऱ्या तांदळाची साठवण कशी करायची या विवंचनेत असणाऱ्या सरकारला निर्यात बंदी काढून टाकण्याची मागणी समर्थनीय आहे. परंतु ते न करता केंद्राने इथेनॉल उत्पादन करण्यासाठी २३ लाख टन तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इथेनॉल उत्पादकांना हा तांदूळ इलेक्ट्रॉनिक लिलाव प्रक्रियेदवारे दर आठवड्यात आपापल्या इथेनॉल क्षमतेएवढा उचलण्याची सूचना केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा