मागील दीड वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ आपण या स्तंभातून खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. वास्तविकपणे शुल्क बदल हे ‘डायनॅमिक’ असावेत, असेही म्हटले होते. म्हणजे तेलबिया, खाद्यतेल यांच्या देशांतर्गत किमती मर्यादेपलीकडे वाढल्या किंवा घसरल्या-तर आपोआप शुल्क कमी किंवा जास्त होईल. परंतु विविध राज्यांतील निवडणुका आणि अलीकडेच संपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्राहकांचा रोष आपल्याला पराभूत करेल या भीतीखाली सतत राहिल्यामुळे केंद्राने आयात शुल्क वाढीचा कटू निर्णय घेणे टाळले. यामुळे उत्पादक शेतकरी वर्ग मात्र नाराज झाला. त्याचा परिणाम मर्यादित स्वरूपात का होईना, पण लोकसभेतील निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे केंद्राला पहिल्यांदाच कुठे तरी उत्पादक वर्गामध्ये शेतीच्या प्रश्नावरून सरकारी धोरणाविरुद्ध ध्रुवीकरण होताना दिसून आले. त्यामुळे आता हरियाणा, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर राज्यातील निवडणुकांपूर्वी आपल्या ग्राहकधार्जिण्या धोरणाऐवजी उत्पादकांना खूश करण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला जाताना दिसतोय. त्यामुळे अचानक एका झटक्यात कांदा किमान निर्यात मूल्य काढणे, निर्यात शुल्क कमी करणे, खाद्यतेल आयात शुल्क वाढ असे अनेक निर्णय घेण्यात आले. मागील लेखात याचे विस्तृत विश्लेषणदेखील केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा